spot_img
महाराष्ट्रराजकीय भूकंप होणार! राजीनाम्यानंतर जयंत पाटील यांना 'या' पक्षाची ‘मोठी’ ऑफर?

राजकीय भूकंप होणार! राजीनाम्यानंतर जयंत पाटील यांना ‘या’ पक्षाची ‘मोठी’ ऑफर?

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते आणि सात वर्षांपासून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेले जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, त्यांना एका राष्ट्रीय पक्षाकडून मोठी ऑफर मिळाल्याची चर्चा रंगली आहे.

जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच नव्या नेतृत्वाला संधी द्यायला हवी असे विधान करत संकेत दिला होता. अखेर आज त्यांनी अधिकृतरित्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला. त्यांच्या जागी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जयंत पाटील यांनी याआधी भाजप आणि अजित पवार गटात जाण्याच्या चर्चांना वारंवार नकार दिला होता.

मात्र, त्यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनीही सूचक विधान करत, “जयंत पाटील आमच्याकडे आले, तर आम्ही स्वागत करू” असे म्हटले आहे. जयंत पाटील हे अलीकडील काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काही कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहिले होते. त्यामुळे त्यांच्या हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, जयंत पाटील यांना एका राष्ट्रीय पक्षाकडून ऑफर मिळाली आहे. यावर त्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली, तरी त्यांच्या आगामी निर्णयाकडे राज्याच्या राजकारणात उत्सुकतेने पाहिले जात आहे.त्यांची पुढील रणनीती, कोणत्याही पक्षासोबत जाण्याचा निर्णय किंवा स्वतंत्र राजकीय भूमिका घेतल्यास, राज्याच्या आगामी राजकीय समीकरणांवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे की शिंदे? धनुष्यबाण कोणाच्या हाती येणार? सुप्रीम कोर्टात आज काय घडलं?

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होताच, शिवसेना पक्षाच्या नावावरून...

साहेब! सांगा कचरा टाकू कुठे? ‘या’ भागातील महिलांचा सवाल, वाचा आयुक्त डांगे यांचे उत्तर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर महानगरपालिकेच्या कचरा संकलन व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून शहरातील...

खळबळजनक आरोप: ‘आरएसएसच्या बैठकीत संभाजी ब्रिगेडला संपवण्याची योजना’

प्रवीण गायकवाड यांचा दीपक काटेला तुरुंगात सुविधा पुरवणार असल्याचा आरोप मुंबई । नगर सहयाद्री:- गेल्या...

नगरमधून अपहरण, आळंदीत अत्याचार; वारकरी शिक्षण संस्थेत चाललंय काय? महिला कीर्तनकारासह..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री पुण्याच्या आळंदी येथे धक्कादाय प्रकार उघडकीस आला असून अहिल्यानगर येथून...