spot_img
देशनेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन; लष्कर-ए-तैयबाची मोठी योजना?

नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन; लष्कर-ए-तैयबाची मोठी योजना?

spot_img

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्‌‍यानंतर पाकिस्तान-समर्थित दहशतवादी संघटना पुन्हा एकदा भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. नेपाळच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबासारख्या संघटना भारतावर हल्ला करण्यासाठी नेपाळची भूमी वापरू शकतात. भारताने नुकत्याच मऑपरेशन सिंदूरफ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी लॉन्चपॅड्स उद्ध्वस्त केल्यानंतर हे विधान समोर आले आहे.

काठमांडूमधील मदक्षिण आशियातील दहशतवाद: प्रादेशिक शांतता आणि सुरक्षेचे आव्हानफ या विषयावरील कार्यक्रमात नेपाळचे राष्ट्रपतींचे सल्लागार सुनील बहादूर थापा यांनी हे वक्तव्य केले. हा कार्यक्रम नेपाळ इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल कोऑपरेशन अँड एंगेजमेंटने आयोजित केला होता. नेपाळ आणि भारतादरम्यानची खुली सीमा आणि व्हिसा-मुक्त व्यवस्था ही देखील चिंतेची मुख्य बाब बनली आहे.

थापा यांच्या मते, दहशतवादी याच व्यवस्थेचा फायदा घेऊन भारतात प्रवेश करू शकतात. नेपाळचे खासदार शिशिर खनाल यांनी पहलगाम हल्ल्‌‍याचा संदर्भ देत म्हटले की, आता भारत आणि नेपाळला एकत्र येऊन सीमा व्यवस्थापन अधिक मजबूत करावे लागेल. त्यांनी हाय-टेक पाळत तंत्रज्ञान, गुप्तचर माहितीची देवाणघेवाण आणि संयुक्त दहशतवादविरोधी कारवाई करण्याची गरज सुचवली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘जलसंपदा विभागाला बेस्ट स्टेट कॅटेगरी प्रथम पुरस्कार’

राहाता । नगर सहयाद्री:- केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने राज्याच्या जलसंपदा विभागाला बेस्ट स्टेट कॅटेगरी २०२४...

लाडक्या बहिणींना दिलासा! पती व वडील हयात नसलेल्या महिलांनाही KYC करता येणार, वाचा प्रोसेस..

मुंबई | नगर सहयाद्री:- लाडकी बहीण योजनेअंतर्गत केवायसी प्रक्रियेबाबत राज्य सरकारकडून एक महत्त्वाचा दिलासा...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींना शुभ ‘गुरुवार’

मुंबई । नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य मुलांमुळे आजची संध्याकाळ प्रसन्न राहील. रटाळ कंटाळवाण्या, त्रासदायक दिवसाचा...

मोबाईल आणि टीव्हीमुळे मुलांचे डोळे धोक्यात! नेत्रतज्ज्ञांच्या 6 सोप्या टिप्स वाचा एका क्लिकवर

नगर सहयाद्री वेब टीम आजच्या डिजिटल युगात मोबाईल, टीव्ही आणि ऑनलाइन क्लासेसमुळे लहान मुलांमध्ये...