spot_img
अहमदनगरपिकअप-रिक्षाचा भीषण अपघात; पाच जण गंभीर जखमी...

पिकअप-रिक्षाचा भीषण अपघात; पाच जण गंभीर जखमी…

spot_img

जामखेड / नगर सह्याद्री

जामखेड करमाळा रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअप वाहनाने पाडळी फाट्यावर असलेल्या चौकात रिक्षाला जोराची धडक दिली असता रिक्षाने दोन ते तीन पलट्या मारल्या व तेथे बसलेल्या पाच जणांच्या अंगावर जाऊन रीक्षा आदळल्याने या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जामखेड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहेत. या प्रकरणी पिकअप चालक युवराज अशोक खैरे (रा. गुरेवाडी ता. जामखेड) याच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की शनिवार दि 25 मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता पिकअप गाडी क्रमांक MH- 16, AY-7382 वरील चालक युवराज अशोक खैरे हा पिकअप घेऊन जामखेड कडे चालला होता. तर फीर्यादी रीक्षाचालक हा आपली रीक्षा घेऊन खुरदैठण येथे आपल्या गावी निघाला होता. याच दरम्यान सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वरील क्रमांकाच्या पिकअप चालकाने आपली पिकअप पाडळी फाट्यावर आली आसता या चालकाने समोरुन येणाऱ्या रीक्षास जोराची धडक दिली. यानंतर या रीक्षाने पलटी मारत रस्त्याच्या बाजूला बसल्या लोकांच्या अंगावर जाऊन पडली. या अपघातात फीर्यादी रीक्षा चालक संतोष गोरख डुचे (रा. खुरदैठण), चेतन पंडित ठाकरे (रा. पाडळी फटा), बाळासाहेब बापू गाडे (रा. पाडळी फटा), हनुमंत सुर्यवंशी (रा. जामखेड) व अतुल विनायक खवळे (रा. पिंपळगाव आवळा) असे एकुण पाच जण जखमी झाले आहेत.

आपघात घडल्या नंतर पिकअप चालकाला तेथील नागरिकांनी पकडुन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही घटना दि 25 मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पाच पैकी तीन जण गंभीर जखमी आहेत. ड्रिंक अँन्ड ड्रायव्ह चाचणीसाठी पोलिसांनी पिकअप चालकाला येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आशी माहिती मिळाली आहे.

या प्रकरणी फिर्यादी रीक्षा चालक संतोष गोरख डुचे याने जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पिकअप चालक युवराज अशोक खैरे (रा. गुरेवाडी ता. जामखेड) याच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. अजय साठे हे करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदार निलेश लंकेंना सुजित झावरे यांचा धक्का ; विश्वासू सहकारीच लावला गळाला

ढवळपुरी गटात राजकारण फिरणार पारनेर/ नगर सह्याद्री : सुजित झावरे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ...

सेनापतींच्या विचारांची देशाची गरज : कवी इंद्रजीत भालेराव

  सेनापती बापट साहित्य संमेलनास सुरुवात सुनील चोभे / नगर सह्याद्री - सध्याच्या काळात एकूण राजकारणात आणि...

दिवसाढवळ्या महिलेचे ‘जेसीबी’ने पाडले घर तर तहसिलच्या आवारातून डंपर चोरणारे जेरबंद; वाचा अहिल्यानगर क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- निंबोडी शिवारात एका महिला गृहिणीच्या घरावर दिवसाढवळ्या ‘जेसीबी’ फिरवल्याची घटना...

आरक्षित कोटा ठरला, आरक्षण सोडतीकडे लक्ष

34 जागांवर महिला आरक्षण | 18 जागांवर ओबीसींना संधी | 11 नोव्हेंबर रोजी सोडत अहिल्यानगर...