spot_img
अहमदनगरजगतापांच्या विरोधात गाडेंनी थोपटले दंड

जगतापांच्या विरोधात गाडेंनी थोपटले दंड

spot_img

शहरात आरोग्य शिबिरातून साखरपेरणी | तयारीला लागण्याच्या पदाधिकार्‍यांना सूचना
अहमदनगर | नगर सह्याद्री:-
आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता दसर्‍यानंतर केव्हाही लागू शकते. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीकडून विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला जात आहे. नगर शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी दंड थोपटले असल्याची खात्रीशीर माहिती आहे. तसेच माजी महापौर संदीप कोतकर यांनीही महाविकास आघाडीकडे उमेदवारीची मागणी केली असल्याचे सांगितले जात आहे.

नगर शहरात आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात कोण लढणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आमदार जगताप हे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत. त्यामुळे जगताप तिसर्‍यांदा विजयासाठी सज्ज झाले आहेत. नगरमध्ये शिवसेनेची ताकद मोठी असल्याने महाविकास आघाडीत येथील जागा ठाकरे गटाच्या शिवसेनेला सुटेल अशी शक्यता आहे.

त्यामुळे ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून जिल्हाप्रुख प्रा. शशिकांत गाडे यांच्यासह स्वर्गीय माजी आमदार अनिल राठोड यांच्या पत्नी शशिकला राठोड, विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहर प्रमुखसंभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, गिरीश जाधव उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. सर्वच इच्छुकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी पक्षप्रमुखांनी नगरची जागा जिंकायचीच असल्याचे सांगत एक नाव निश्चित करा व एकदिलाने काम करण्याच्या सुचना पदाधिकार्‍यांना दिल्या आहेत. अद्याप ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून एका नावावर शिक्कामोर्तब झाले नसले तरी जिल्हाप्रमुख गाडे यांनी आरोग्य शिबीराच्या माध्यमातून साखर पेरणी चालविली असल्याचे बोलले जातेय. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी महापौर अभिषेक यांनी तर काँग्रेसकडून शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी तयारी चालविली आहे.

शशिकला राठोड, विक्रम राठोड यांनीही केला पक्षाकडे दावा
अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात लढण्यासाठी राठोड परिवाराने पुन्हा एकदा दंड थोपटले आहेेत. तसेच शिवसेना ठाकरे गटाच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांकडे स्वर्गीय माजी आमदार अनिल राठोड यांच्या पत्नी शशिकला राठोड व चिरंजीव विक्रम राठोड यांनी दावा सांगितला आहे. नगर शहरात २५ वर्ष स्वर्गीय अनिल राठोड यांनी प्रतिनिधीत्व केले. भयमुक्त नगर आणि सुरक्षित नगरच्या नावाखाली त्यांनी निवडणुका लढविल्या. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले. आणि त्याच निवडणुकीत अनिल राठोड यांचा निसटता पराभव झाला. परंतु, त्यानंतर राठोड यांच्या नेतृत्वाखाल महापालिकेची निवडणूक झाली त्यात सर्वाधिक नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही राठोड यांना आमदार संग्राम जगताप यांच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले. परंतु, गेली २५ वर्ष नगरकरांना संरक्षण दिल्याने आजही नगर शहरात राठोड यांना मानणारा वर्ग मोठा आहे. तसेच नगर शहर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्यामुळे नगर शहरातून राठोड परिवारातीलच उमेदवार द्यावा अशी मागणी निष्ठावंत शिवसैनिकांकडून वरिष्ठांकडे केली जात आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे माजी आमदार अनिल राठोड यांच्या पत्नी शशिकला राठोड व चिरंजीव विक्रम राठोड यांनीही उमेदवारीसाठी दावा सांगितला आहे. त्यामुळे राठोड परिवाराने केलेल्या उमेदवारीच्या दाव्याबाबत पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शहरातून कोतकर कुटुंबीयांना उमेदवारी नकोच!; शहर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा ‘लेटरबाँब’!

नगर शहरातील राजकारणाच्या झालेल्या गुन्हेगारीकरणाला कायमस्वरूपी आळा घालण्याची मागणी/  कोतकरांच्या ‘मविआ’तील उमेदवारीत मोठा अडसर अहमदनगर...

पुन्हा एका मल्टिस्टेटच्या चेअरमनला अटक; ‘इतक्या’ कोटींचा गैरव्यवहार

अहमदनगर | नगर सह्याद्री:- परळी पीपल्स मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या ११ कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे...

सुप्याच्या सरपंच मनीषा रोकडे यांना दिलासा; ‘ती’ मागणी फेटाळली

अतिक्रमण मुद्द्यावरून सरपंचपद रद्द करण्याची मागणी फेटाळली पारनेर | नगर सह्याद्री:- अतिक्रमणाच्या मुद्यावरुन सुप्याच्या सरपंच मनिषा...

मोठी बातमी: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे ३८ निर्णय, वाचा सविस्तर..

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती समोर...