spot_img
अहमदनगर२४ सप्टेंबरपासून पारनेरकर करणार आमरण उपोषण! नेमकी मागणी काय? वाचा सविस्तर..

२४ सप्टेंबरपासून पारनेरकर करणार आमरण उपोषण! नेमकी मागणी काय? वाचा सविस्तर..

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री:-
सरसकट कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्र शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली असून मागण्यांची तड लावण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी तसेच सदस्य येत्या २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषणाचे अस्व उगारणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर यांनी दिली.

पश्चिम वाहिन्यांचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी बळवून नगर जिल्हयातील दुष्काळी भगाला देण्यात यावे, कान्हूरपठार, पुणेवाडी, जातेगांव, राळेगणसिध्दी, शहाजापुर उपसा सिंचन योजनेला मान्यता देऊन कार्यान्वीन कराव्यात, डिंबे माणिकडोह बोगद्याचे काम त्वरीत सुरू करण्यात यावे, अटी, शर्ती न लावता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्या, नियमित कर्जदारांना प्रोत्साहनपर देण्यात येणारे ५० हजारांचे अनुदान ठराविक शेतकऱ्याऱ्यांना मिळाले, उर्वरीत शेतकऱ्यांना ते मिळावे.

संघटनेच्या वतीने अध्यक्ष संतोष वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या आंदोलनासंदर्भात उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख अशोक आंधळे, जिल्हा संपर्क प्रमुख राम बाडेकर, जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेब झांबरे, प्रविण खोडदे, तालुका कार्याध्यक्ष संजय भोर, आदी उपस्थित होते.

योजनांना मान्यता द्या
कुकडी प्रकल्पाच्या १९६६ च्या प्रशासकीय मान्यतेमध्ये या दुष्काळी भागासाठी एक टीएमसी पाण्याची तरतुद करण्यात आलेली आहे. मात्र अद्यापपर्यंत पाण्यावाचून पारनेर, नगर, श्रीगोंद्याचा बराचसा भाग वंचित राहीलेला आहे. कान्हूरपठार, पुणेवाडी, जातेगांव, राळेगणसिध्दी, शहांजापुर या उपसा सिंचन योजनांची शासन दरबारी नोंद असल्याने या योजनांना मान्यता देउन त्या कार्यान्वीत कराव्यात व शेतकऱ्यांना न्याय द्यावा.
-संतोष वाडेकर
(अध्यक्ष, भूमिपुत्र शेतकरी संघटना)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...