spot_img
अहमदनगरखोट्या सहानुभूतीला फसले, आता 'ती' चूक पुन्हा करणार का? खासदार विखेंचा पारनेरकरांना...

खोट्या सहानुभूतीला फसले, आता ‘ती’ चूक पुन्हा करणार का? खासदार विखेंचा पारनेरकरांना सवाल

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री-
भावनांशी खेळून मत मागणे आपल्याला जमत नाही. डॉटर या नात्याने रूग्णांना सेवा देतानाचे व्हिडीओ काढणे आपल्याला पसंत नाही. केलेल्या विकास कामांवर आपण मतदान मागत आहोत. कोणतेही सर्व्हे येवू द्यात, मात्र मला विजयी करण्याचा सर्व्हे गरीबांच्या मनात ठामपणे असल्याचा विश्वास महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. अहमदनगर लोकसभा मतदार संघात महायुतीतचाच वियय होणार असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. खोट्या सहानुभूतीला यापुर्वी पारनेर तालुका फसला. आता पुन्हा ती चूक या तालुयातील जनता करणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पारनेर तालुयात आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खा.विखे पाटील बोलत होते. याप्रसंगी भाजपाचे तालुका अध्यक्ष राहुल शिंदे, प्रा.विश्वनाथ कोरडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत गायकवाड, सोनाली चालके, बंडू रोहकले, बाबासाहेब खिलारी, सचिन वराळ, रवींद्र पूजारी, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

खा. विखे पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुक ही देशाची आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडून भारतीय जनता पक्ष मतदान मागत आहे. मागच्या पाच वर्षात केंद्र सरकारच्या माध्यमातून योजनाचा लाभ सामान्य माणसापर्यत पोहचवला. जे प्रामाणिकपणे केले तेच आपण लोकांमध्ये जावून सांगत आहोत. इतरांसारखी खोटी सहानुभूती आपल्याला मिळवायची नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोव्हीड संकटात डॉटर नात्याने आपणही हजारो रुग्णांची सेवा केली. पण समोर रूग्ण मरणांशी झुंज देत असताना त्याच्यावर उपचार करतानाचे व्हीडीओ टाकण्याचा मोह आपल्याला कधी झाला नाही आणि होणारही नाही असे सांगून डुप्लीकेट व्हिडीओ करून राजकारण करण्याची पध्दत आमची नाही. विखे पाटील परीवार लोकांमध्ये जावून काम करतो. या जिल्ह्यातील लोकांच्या सुख दुखात सहभागी होवून लोकांचे पाठबळ मिळवतो. प्रेमाच्या आणि जीवाभावाच्या लोकांमुळेच विखे परीवाराला राजकारणात अनेक वर्ष संधी मिळाली.त्यामुळे आमचा सर्वे लोकांच्या मनात आहे.

कोणाचेही सर्वे येवू द्यात अहिल्यानगर मतदार संघातून महायुतीचाच विजय होणार आणि पारनेर तालुयातून सर्वाधिक मतांची आघाडी मिळणार असल्याचा दावा खा.सुजय विखे पाटील यांनी केला.खोट्या सहानुभूतीला यापुर्वी पारनेर तालुका फसला. आता पुन्हा ती चूक या तालुयातील जनता करणार नाही असा विश्वास व्यक्त करून या तालुयातील जनतेने आता विकास कामाची तुलना करण्याची गरज आहे. दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला.

काम कमी आणि व्हिडीओच जास्त अशी परिस्थिती तालुयाची असल्याचा टोला लगावून पारनेर हा विचारांचा तालुका आहे. जनता सूज्ञ आहे. एकदा झालेली चूक पुन्हा होणार नाही असेही त्यांनी सांगितले.लोकसभेची निवडणूक देशाचे भवितव्य घडवविणारी आहे. तशीच पारनेर तालुयाच्या भवितव्यासाठी महत्वपूर्ण आहे. या भागातील युवकांचे भविष्य आपल्याला घडवायचे आहे. समृध्द सुशिक्षित आणि सुरक्षित पारनेर करीता आपल्या सर्वाच्या सहकार्याने काम करायचे असल्याचे डॉ विखे पाटील म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मंत्री विखे शेतकऱ्यांच्या बांधावर; अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची केली पाहणी, दिले महत्वाचे आदेश..

पाथर्डी | नगर सह्याद्री सोमवारी अहमदनगर शहरासह जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. अनेक भागात अतिवृष्टी...

आयत्या पिठावर रेघोट्या मारून, खोटे सांगून क्रेडिट का घेता?; माजी मंत्री थोरात यांचा विरोधकांना सवाल

संगमनेर | नगर सह्याद्री दुष्काळी भागाला पाणी मिळावे याकरता सहकारमहष भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून कारखान्याच्या...

जीएसटी समितीच्या अहिल्यानगर शहर संयोजकपदी निखिल वारे

अहिल्यानगर | नगर सह्याद्री वस्तू आणि सेवांवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय सर्वसामान्यांसाठी लाभकारक आहे. पंतप्रधान...

महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर 40 जणांचा आक्षेप, वाचा, सविस्तर

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती दाखल करण्यासाठी दिलेल्या अंतिम दिवसापर्यंत (15...