spot_img
ब्रेकिंगपंकजा मुंडेंचे राजकीय ग्रहण सुटलं; भाजपने घेतला मोठा निर्णय...

पंकजा मुंडेंचे राजकीय ग्रहण सुटलं; भाजपने घेतला मोठा निर्णय…

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री
विधान परिषदेवरील ११ जागांच्या निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने पाच जणांना तिकिटं जाहीर केली आहेत. पाच वर्षांपासून राजकीय पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या पंकजा मुंडे यांना भाजपने तिसरी संधी दिली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे पाच वर्षांनी विधिमंडळात दिसणार आहेत. पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे या पाच जणांना भाजपने विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे.

पंकजा मुंडे यांचा संसदीय राजकारणातील प्रवास काहीसा खडतर राहिला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघातून त्या महायुतीतर्फे भाजप उमेदवार होत्या. परंतु महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी पंकजांना पराभवाची धूळ चारली.

याआधी, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघातून बंधू धनंजय मुंडेंकडून त्यांना पराभवाचा धक्का बसला होता. त्यानंतर पंकजांना लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालीच नाही. दोन वेळा खासदार राहिलेल्या बहीण प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करत भाजपे पंकजा मुंडे यांना तिकीट दिलं होतं, मात्र ते राखण्यात त्यांना यश आलं नव्हतं.

दरम्यानच्या काळात विधानपरिषद असो किंवा राज्यसभा, प्रत्येक निवडणुकीच्या वेळी पंकजा मुंडे यांच्या नावाची केवळ चर्चा होत असे, मात्र त्यांना एकदाही उमेदवारी मिळाली नव्हती. २०१९ च्या विधानसभेला सुरु झालेला त्यांचा राजकीय संन्यास कायम राहिला. त्याआधी देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये पंकजा मुंडे यांनी महिला व बालकल्याण विभागाचे मंत्रिपद सांभाळले आहे.

विधान परिषदेच्या ११ जागांच्या निवडणुकीसाठी उद्या म्हणजेच २ जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. १२ जुलै रोजी रोजी मतदान असून त्याच दिवशी मतमोजणीनंतर निकाल जाहीर होणार आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरात परीक्षेच्या तयारीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटके करत, वारंवार फोटो व्हायरल करण्याची धमकी...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या विजयाची सुरवात, भरघोस यश प्राप्त होणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. चैतन्याने सळसळता...

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...