spot_img
अहमदनगरजिंकून येणार्‍यालाच मिळणार तिकिट! आमदारांच्या बैठकीत फडणवीस काय-काय म्हणाले? वाचा सविस्तर ..

जिंकून येणार्‍यालाच मिळणार तिकिट! आमदारांच्या बैठकीत फडणवीस काय-काय म्हणाले? वाचा सविस्तर ..

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी बैठकांचा धडाका लावला आहे. सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विभागानुसार भाजप आमदारांच्या बैठका घेत असल्याचं चित्र दिसत आहे. गुरूवारी रात्री फडणवीसांनी पश्चिम महाराष्ट्रातील भाजप आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आमदारांना विधानसभेचा कानमंत्र दिला. तसेच जिंकून येणार्‍या आमदारालाच तिकिट देणार असल्याचे सांगितल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांची धाकधूक वाढली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी रात्री पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली आहे. प्रलंबित विकासकामे लवकर मार्गी लावण्यास मी स्वतः मदत करेल असेही त्यांनी आमदारांना सांगितले आहे. लोकसभेत ज्या ज्या मुद्यांवर फटका बसला, त्याचाही आढावा या बैठकीत घेण्यात आला आहे.

मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, याबरोबरच शेतमालाचा भाव यावरही आमदारांसोबच फडणवीसांनी चर्चा केली आहे. लाडकी बहिण, युवा प्रशिक्षण या योजना प्रत्येक गावात पोहोचवा. महायुतीच्या स्थानिक सर्व पदाधिकार्‍यांना सोबत घेऊन काम करा अशा सूचना फडणवीस यांनी यावेळी दिल्या आहेत. तसेच जिंकून येणार्‍या आमदारालाच तिकिट देणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. त्यामुळे आता आमदारांची धाकधूक वाढली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सामूहिक आत्महत्येने नाशिक हादरले, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने २ मुलांसह विहिरीत मारली उडी

नाशिक / नगर सह्याद्री - नाशिकमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने दोन मुलांसह सामूहिक आत्महत्या केल्याची घटना...

मनपाच्या मतदार यादीत २० हजार नावांची हेराफेरी; कोण काय म्हणाले पहा

दोषींवर गुन्हा दाखल करण्याची नितीन भुतारे यांची मागणी अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर महानगरपालिकेने...

शहरात संविधान गौरव दिन उत्साहात साजरा; संविधानाच्या उपदेशकेचे सामूहिक पठन

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- आंबेडकरी समाजाच्या वतीने संविधान गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात...

जगात भारतीय संविधान सर्वश्रेष्ठ: पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

लोणी । नगर सहयाद्री:- संविधानाने देशातील प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य, समता, बंधूता आणि न्यायाचा मंत्र...