spot_img
अहमदनगरमहायुतीमध्ये फक्त मारामारी, 'त्यांची'..; आमदार थोरात नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर..

महायुतीमध्ये फक्त मारामारी, ‘त्यांची’..; आमदार थोरात नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर..

spot_img

संगमनेर । नगर सहयाद्री :-
राज्यामध्ये महाविकास आघाडीला अत्यंत चांगले वातावरण आहे. याउलट महायुतीमध्ये खूप मारामारी आहे. त्यांची आणि महाविकास आघाडीची तुलना नको असे सांगताना राज्यातील 125 जागांवर सहमती झाली असून उर्वरित जागांवरही सर्व सहमतीने निर्णय होईल .येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 180 पेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास विधिमंडळ पक्षाचे नेते तथा राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर ते माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलत होते, यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत दोन तीन बैठका झाल्या असून 125 जागांवर सहमती झाली आहे .उर्वरित जागांवर गणेश विसर्जन नंतर बैठक होऊन सहमती होईल. समविचारी पक्षांना बरोबर घेऊन आम्ही निवडणूक लढवणार असून महाविकास आघाडीला अत्यंत चांगले वातावरण आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत 180 पेक्षा जास्त जागा आम्ही मोठ्या मताधिक्याने जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला

याच बरोबर महायुतीमध्ये सध्या फक्त मारामारी सुरू आहे. त्यांची दररोज भांडणे आपण पाहत आहोत त्यांची आणि महाविकास आघाडीची तुलना नको असेही आमदार थोरात यांनी म्हटले असून इतर समविचारी पक्षांना बरोबर घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. तसेच महाराष्ट्रात झालेली पक्ष फुट किंवा कुटुंबातील फूट ही राज्यातील जनतेला आवडली नसून लोकसभा निवडणुकीमध्ये त्याचा प्रत्यय महायुतीला आला आहे .

बारामती मध्ये व्हायरल झालेले पत्र हे प्रतिनिधिक असू शकते असे सांगताना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना कधीही धर्माचा भेद करत नाही. बंधुभाव ही आपल्या देशाची ताकद असून ती वाढवण्यासाठी महाविकास आघाडी काम करत आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत मोठ्या मताधिक्याने 180 जागा जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Ahmednagar Politics News: राष्ट्रवादीचे संपत बारस्कर आंदोलन छेडणार! कारण काय? वाचा सविस्तर

Ahmednagar Politics News; सावेडी उपनगर परिसरात बंधन लॉन ते राजवीर चौक ते भिस्तबाग महाल...

Ahmednagar Accident News: अहमदनगरमध्ये भीषण अपघात? तीन ठार; दोन गंभीर..

Ahmednagar Accident News: अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदाता लुक्यातील पारगाव रस्त्यावर एक ते दीड तासाच्या अंतराने...

Pitru Paksha: पितृपक्षात श्राद्ध विधी करणे गरजेचा का आहे? महाभारताच्या १३ व्या अध्यायात नेमकं काय? जाणून घ्या

Pitru Paksha : पितृ पक्षाच्या काळात व्यक्तीने आपल्या पितरांच्या मोक्ष आणि समाधानासाठी श्राद्ध, तर्पण...

Ahmednagar Crime: खळबळजनक! पोलिसांना मध्यस्थी भोवली! आरोपींकडून मारहाण; कुठे घडला प्रकार?

Ahmednagar Crime: कोपरगाव तहसील कार्यालयात शेजारी असलेल्या लॉकपगार्ड येथे आरोपी आपापसात भांडत करत असतांना...