spot_img
महाराष्ट्रकांद्याला भावच नाही, शेतकऱ्याने काय केले पहा...

कांद्याला भावच नाही, शेतकऱ्याने काय केले पहा…

spot_img

रांधेतील शेतकर्‍याने कांद्याला भाव नसल्याने पीक केले नष्ट
पारनेर | नगर सह्याद्री
गेल्या वर्षभरात कांद्याला सरकारने अत्यल्प भाव दिला आहे. त्यामुळे रांधे येथील युवा शेतकरी संतोष शिंदे यांनी भाव नाही म्हणून कांदा या पिकावर रोटर फिरवून ते नष्ट केले आहे.

याबाबत माहिती देताना युवा शेतकरी संतोष शिंदे यांनी सांगितले की किमान आता तरी भाव मिळेल या अपेक्षेने कांद्याचे हिवाळी पीक घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. मात्र चार ते पाच रुपये किलो भाव मिळत असेल तर कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी करायचे तरी काय? याचा निषेध म्हणून आम्ही कांदा या पिकावर रोटर फिरवून सरकारचा निषेध केला आहे.

तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या कार्यकाळात कांद्याला चांगला भाव मिळत होता. तसेच सर्वाधिक कर्जमाफी करण्याचे काम पवार साहेब यांनी केले आहे. मात्र आजचे मोदी व फडणवीस सरकार शेतकर्‍यांचे शोषणकर्ते असून यांनी शेतकर्‍यांचे वाटोळे केले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करीत शेतकर्‍यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याची प्रतिक्रिया शिंदे यांनी व्यक्त केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर तालुक्यात बिबट्याची भीती; गावांना दिवसा वीज पुरवठा करावा

माजी सभापती अभिलाष घिगे, सरपंच भाऊसाहेब बहिरट यांची महावितरणकडे मागणी सुनील चोभे | नगर सह्याद्री गेल्या...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भिजतं घोंगडं; याचिकेवर ‘या’ तारखेला सुनावणी होणार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षणाच्या मर्यादेबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत मोठी...

अजित पवार.. सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाय!; महाराष्ट्रात राजकारण तापले, माफीनामा अन कोण काय म्हणाले..

माजी आमदारपुत्राचं उपमुख्यमंत्र्यांना आव्हान; सोलापुरात वातावरण तापलं सोलापूर | नगर सह्याद्री सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुयातील अनगर...

​कामरगावात दुकानदाराचे घर फोडले; पावणेदोन लाखांचा ऐवज लांबविला

​लबाडीच्या इराद्याने घरातील वस्तू, सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमेवर डल्ला; नगर तालुका पोलिसांत गुन्हा...