spot_img
अहमदनगरकांद्याचे भाव कोसळले ! साडेचार हजारांचा भाव थेट दोन हजारांवर, संतप्त शेतकरी...

कांद्याचे भाव कोसळले ! साडेचार हजारांचा भाव थेट दोन हजारांवर, संतप्त शेतकरी उतरले रस्यावर

spot_img

नगर सह्याद्री / संगमेनर : कांद्याचे भाव जवळपास साडेचार हजारांपर्यंत गेला होता. शेतकऱ्यांना कुठे आर्थिक स्थिरतेची आशा दिसू लागली होती. परंतु आता पुन्हा एकदा कांद्याचे भाव कोसळले आहेत. कांदा एकाच दिवसात जवळपास दोन हजारांनी कोसळले आहेत. शुक्रवारी कांद्याला २००० रुपयांपर्यंत भाव आले होते.

निर्यातबंदी
केंद्र शासनाने ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यातीवर बंदी लागू केली आहे. कांद्याच्या वाढत्या किमती लक्षात घेता यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र शासनाने हा निर्णय घेतला आहे. परंतु याने मात्र नगर, नाशिक जिल्ह्यासह राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.

शेतकरी संतप्त
कांद्याचे भाव पडल्याने शेतकरी संतप्त झाले होते. मनमाड, लासलगावसह अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव झालेले नाहीत. अनेक ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले. संगमनेरबाजार समितीत देखील शेतकरी संतप्त झाले होते. कांद्याचे भाव अचानक कोसळल्यामुळे संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नाशिक-पुणे मार्ग अडवला. केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

सुमारे दीड तास शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन याठिकाणी केले होते. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. अखेर संगमनेर बाजार समितीच्या सभापतींनी फेर लिलाव करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

भाव वाढवत नाही तोपर्यंत लिलाव बंद
जोपर्यंत केंद्र सरकार कांद्याचे भाव वाढवत नाही तोपर्यंत संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहणार असून शेतकऱ्यांनी आपला कांदा बाजार समितीमध्ये न आणण्याचे आवाहन बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर व सचिव सतीश गुंजाळ यांनी केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...