spot_img
महाराष्ट्रनुसती विधानपरिषद नको, तर कॅबिनेट मंत्रीपदच हवं; लक्ष्मण हाके नेमकं काय म्हणाले...

नुसती विधानपरिषद नको, तर कॅबिनेट मंत्रीपदच हवं; लक्ष्मण हाके नेमकं काय म्हणाले पहा

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय झाला. महाविकास आघाडीचा राज्यात सुपडासाफ केला. तब्बल २३६ जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले. या विजयानंतर आता राज्यात राजकीय हालचाली वेगाने होत आहेत. महायुतीकडून सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला असून, मुख्यमंत्रि‍पदाची शर्यतही अटातटीची झाली आहे.

महायुतीसह दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वातही खल सुरू आहे. त्याचवेळी महाराष्ट्रात ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी महायुतीकडे मोठी मागणी केली आहे. ‘नुसती विधानपरिषद नको, तर कॅबिनेट मंत्रिपदच हवं.’, अशी थेट मागणी त्यांनी केली आहे.

पुण्यामध्ये लक्ष्मण हाके यांनी साम टीव्हीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका करत निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, ‘जरांगेंना लोक कंटाळले आहेत. १३० जागा पाडायची भाषा केली होती त्यांनी. जिथं मेसेज दिला तिथं लोक मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. जरांगे खोटं बोलत आहे. पण मी जिथं सभा घेतल्या तिकडच्या उमेदवारांना चांगली मतं पडली आहेत.’

लक्ष्मण हाके म्हणाले की, जरांगे काहीही बोलत आहेत. आम्ही राजेश टोपेंना पाडलं. लबाड माणूस आहे. निवडणूक निकाल ही जरांगेंना चपराक आहे. आम्ही ओबीसीला जवळचे मानणारी माणसे आहोत तसेच महायुतीची सुपारी घेतल्याचे जरांगे जाहीरपणे बोलले होते. बाप्पा सोनवणे निवडून आले तेव्हा तेही म्हणत होते की जरांगेमुळे निवडून आलो.’

गृहमंत्री, अर्थमंत्री करायला हवं – हाके
लक्ष्मण हाके म्हणाले की, ‘मला विधानपरिषदच काय, कॅबिनेट मंत्रिपद हवंय. गृहमंत्री, अर्थमंत्री किंवा केंद्रात काय तर द्यायला हवं. अर्ध्या समाजाचे प्रतिनिधित्व मी करतोय.’ दरम्यान, लक्ष्मण हाके यांनी केलेली मागणी आता महायुती पूर्ण करते की नाही हे येत्या काही दिवसांत कळेल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

एमआयडीसीत टोळक्याचा तरूणावर कोयत्याने हल्ला; नेमकं काय घडलं

अहिल्यानगर | नगर सह्याद्री एमआयडीसी परिसरात एका टोळयाने तरूणावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना समोर आली...

ढगाळ वातावरण! कांदा उत्पादक चिंतेत; काय होणार परिणाम

श्रीगोंदा | नगर सह्याद्री श्रीगोंदा तालुयामध्ये कांदा काढणीचा हंगाम जोरात सुरू आहे. परंतु  सध्या ढगाळ...

काळजी घ्या! उष्माघाताचे ‘इतके’ रुग्ण; आरोग्य विभागाने दिला हा इशारा

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या ढगाळ वातावरण निर्माण झाले असले तरी मार्च महिन्याच्या...

चुलत्याच्या कृपेनं बरं चाललंय, अजितदादादांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ, काय म्हणाले पहा

बीड / नगर सह्याद्री - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या त्या वक्तव्यानंतर राष्ट्रावादी काँग्रेसचे दोन्ही गट...