spot_img
महाराष्ट्रनुसती विधानपरिषद नको, तर कॅबिनेट मंत्रीपदच हवं; लक्ष्मण हाके नेमकं काय म्हणाले...

नुसती विधानपरिषद नको, तर कॅबिनेट मंत्रीपदच हवं; लक्ष्मण हाके नेमकं काय म्हणाले पहा

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय झाला. महाविकास आघाडीचा राज्यात सुपडासाफ केला. तब्बल २३६ जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले. या विजयानंतर आता राज्यात राजकीय हालचाली वेगाने होत आहेत. महायुतीकडून सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला असून, मुख्यमंत्रि‍पदाची शर्यतही अटातटीची झाली आहे.

महायुतीसह दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वातही खल सुरू आहे. त्याचवेळी महाराष्ट्रात ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी महायुतीकडे मोठी मागणी केली आहे. ‘नुसती विधानपरिषद नको, तर कॅबिनेट मंत्रिपदच हवं.’, अशी थेट मागणी त्यांनी केली आहे.

पुण्यामध्ये लक्ष्मण हाके यांनी साम टीव्हीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका करत निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, ‘जरांगेंना लोक कंटाळले आहेत. १३० जागा पाडायची भाषा केली होती त्यांनी. जिथं मेसेज दिला तिथं लोक मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. जरांगे खोटं बोलत आहे. पण मी जिथं सभा घेतल्या तिकडच्या उमेदवारांना चांगली मतं पडली आहेत.’

लक्ष्मण हाके म्हणाले की, जरांगे काहीही बोलत आहेत. आम्ही राजेश टोपेंना पाडलं. लबाड माणूस आहे. निवडणूक निकाल ही जरांगेंना चपराक आहे. आम्ही ओबीसीला जवळचे मानणारी माणसे आहोत तसेच महायुतीची सुपारी घेतल्याचे जरांगे जाहीरपणे बोलले होते. बाप्पा सोनवणे निवडून आले तेव्हा तेही म्हणत होते की जरांगेमुळे निवडून आलो.’

गृहमंत्री, अर्थमंत्री करायला हवं – हाके
लक्ष्मण हाके म्हणाले की, ‘मला विधानपरिषदच काय, कॅबिनेट मंत्रिपद हवंय. गृहमंत्री, अर्थमंत्री किंवा केंद्रात काय तर द्यायला हवं. अर्ध्या समाजाचे प्रतिनिधित्व मी करतोय.’ दरम्यान, लक्ष्मण हाके यांनी केलेली मागणी आता महायुती पूर्ण करते की नाही हे येत्या काही दिवसांत कळेल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्यांचे हल्ले थांबवा, अन्यथा शस्त्र परवाने द्या, कोणी केली मागणी पहा

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी, मजूर, शालेय...

हैदराबाद गॅझेट संदर्भात हाय कोर्टाचा मोठा निर्णय, काय दिलाय निर्णय?

मुंबई / नगर सह्याद्री मराठा समाजाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हैदराबाद गॅझेटच्या...

व्होट चोरीवर राहुल गांधींचा सर्वात मोठा बॉम्ब!; मत अ‍ॅड अन् डिलीट कशी केली जातात? सर्व दाखवलं

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी...

…तर लक्ष्मण हाकेंना रस्त्यावर ठोकू, लेकीबाळीची इज्जत काढतोय; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या लग्नाच्या वक्तव्यावरून राजकाराण तापलं...