spot_img
महाराष्ट्रनितेश राणेंचे वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, ‘EVM म्हणजे...

नितेश राणेंचे वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, ‘EVM म्हणजे…

spot_img

सांगली / नगर सह्याद्री –
भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे त्यांच्या वक्तव्यामुळे सातत्याने चर्चेत आहेत. आता सांगली दौऱ्यावर असताना केलेल्या त्यांच्या वक्तव्यावरून नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. ‘आम्ही ईव्हीएममुळेच जिंकलो. पण, ईव्हीएम म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला’, असे वादग्रस्त वक्तव्य नितेश राणे यांनी केले आहे.

नितेश राणे सांगली दौऱ्यावर असताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. सांगलीतील हिंदू गर्जना सभेत बोलताना नितेश राणे म्हणाले की, ईव्हीएमच्या नावाने विरोधक बोंबलत आहेत, कारण त्यांना सहन होत नाहीये की, हिंदू समाज एकत्र येऊन कसे मतदान करतो. विरोधकांना वाटत होते हिंदू समाज मतदान करायला एकत्र येऊ शकत नाही.

हे ईव्हीला ला दोष देतात, पण या लोकांना ईव्हीएमचा अर्थच माहिती नाही. हिंदू समाजाने कुठल्या विचाराने मतदान केलं हे विरोधकांना कळलाच नाही. ईव्हीएमचा अर्थ होतो ‘एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला’, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे.

जो नियम हिंदूंना लागू होतो तो इतर धर्माला देखील लागला पाहिजे. आता सरकार हिंदुत्ववादी आहे, आता कोणाचे लाड चालणार नाहीत, असे देखील ते यावेळी बोलताना म्हणाले. नितेश राणेंच्या ईव्हीएमविषयीच्या या वादग्रस्त वक्तव्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील विचारण्यात आले. मात्र, यावर प्रतिक्रिया देणे मुख्यमंत्र्यांनी टाळल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, याच कार्यक्रमात बोलताना भाजपचे मिरजचे आमदार सुरेश खाडे यांनी देखील वादग्रस्त वक्तव्य केले. ‘आम्ही जरी दलित असलो तरी आम्ही हिंदू आहे, त्यामुळे आम्ही मागे नाही. आम्ही पण मिनी पाकिस्तानमध्ये लढतो. मी मिनी पाकिस्तानमधून चारवेळा चौकार मारत आमदार झालो आहे’, असे वक्तव्य खाडे यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पैसा झाला खोटा, घोटाळा झाला मोठा जादा परताव्याचे आमिष ; अहिल्यानगरकरांचे करोडो रुपये लुटले

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जादा परताव्याचे आमिष, महिनाभरात पैसे डबल करण्याचे आमिष दाखवत जादा...

‌‘एपीएमसी‌’ मार्केट नवी मुंबईतून हद्दपार?, वाचा कारण..

नवी मुंबई | नगर सह्याद्री मुंबईतील वाढती लोकवस्ती, वाहतुकीचे प्रश्न आणि जागेची अनुपलब्धता या कारणांसाठी...

भयंकर अपघात: रेल्वेची क्रॉसिंग पॉईटवर शाळेच्या बसला जोरदार धडक, अनेक चिमुकले..

Railway Crossing Accident: तामिळनाडूच्या कडलूर जिल्ह्यातील सेम्मानगुप्पम भागात आज सकाळी एक हृदयद्रावक अपघात घडला....

बावडी शिवारात धक्कादायक प्रकार; चार आरोपींना तात्काळ अटक!, नेमकं काय घडलं?

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- तालुक्यातील बावडी शिवारात गायी व गोऱ्यांची वाहतूक करणाऱ्या मजुरावर चार...