spot_img
ब्रेकिंगवीज पडून नऊ जणांचा मृत्यू; महिला आणि लहान मुलांचा समावेश, कुठे घडली...

वीज पडून नऊ जणांचा मृत्यू; महिला आणि लहान मुलांचा समावेश, कुठे घडली घटना पहा

spot_img

नवी दिल्ली / वृत्तसंस्था –
ओडिशाच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वीज कोसळून ६ महिलांसह किमान ९ जणांचा मृत्यू झाला. राज्यात मुसळधार पाऊस आणि वादळाच्या दरम्यान हे अपघात घडले. काही लोक जखमीही झाले आहेत. कोरापुट जिल्ह्यातील पारिडीगुडा गावात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. हे लोक शेतात काम करत होते आणि पावसामुळे तात्पुरत्या झोपडीत थांबले होते. याचदरम्यान थेट झोपडीवर वीज कोसळल्याने दुर्घटना घडली.

कोरापुत जिल्ह्यात 3 लोक मरण पावले, जाजपूर आणि गंजममध्ये 2-2 लोक मरण पावले आहेत. त्याच वेळी धेंकनल आणि गजपती जिल्ह्यात 1-1 लोक मरण पावले आहेत. मरण पावलेल्यांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे.

जाजपूर जिल्ह्यातील धर्मशाळा परिसरात मुसळधार वादळ आणि पावसात तारे हेम्ब्रम आणि तुकुलू चत्तर नावाच्या दोन मुलांचा मृत्यू झाला. दोन्ही मुले जनापूर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बुरुसाही गावातील रहिवासी होती. ते एका मातीच्या घराच्या व्हरांड्यात उभे होते, तेव्हा त्यांच्यावर वीज कोसळली. दोघांचाही जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत आणि गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

गंजम जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये कबी सूर्यनगर तहसीलमधील बरीदा गावात ओम प्रकाश प्रधान नावाच्या विद्यार्थ्याचा वीज पडून मृत्यू झाला. त्याच वेळी, बेलगुथ परिसरात आंब्याच्या बागेत आंबे वेचताना वीज पडून एका तरुणीचा मृत्यू झाला. ढेंकनाल आणि गजपती येथेही मृत्यू झाले आहेत.

ढेंकनाल जिल्ह्यातील कुसुमुडिया गावात वीज पडून सुरुशी बिश्वाल नावाच्या महिलेचा मृत्यू झाला. तर, गजपती जिल्ह्यातील मोहन भागात एका महिलेचा ट्रॅक्टरमधून विटा उतरवत असताना वीज पडून मृत्यू झाला. या घटनेनंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयांनी मृतांच्या कुटुंबियांना सरकारच्या विद्यमान धोरणानुसार आर्थिक मदत दिली जाईल,असे सांगितले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

चार खासदार हनी ट्रॅपचा जाळ्यात! संजय राऊतांचा ट्विट बॉम्ब, वाचा सविस्तर

मुंबई | नगर सह्याद्री:- राज्यातील राजकारण पुन्हा एकदा हनी ट्रॅप प्रकरणामुळे ढवळून निघाले असून, शिवसेना...

थाटामाटात लग्न पार पडले अन् ‘नवरदेवा’वरच गुन्हा दाखल झाला! काय आहे प्रकरण?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- अहिल्यानगर येथील कोतवाली पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीशी बालविवाह घडवून आणल्याप्रकरणी...

मुख्याध्यापकाकडे मागीतली पाच लाखांची खंडणीची; ‘या’ संस्थेच्या चेअरमनसह दोघांवर गुन्हा दाखल

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात एका शिक्षकाने शाळेच्या चेअरमन आणि स्वीकृत सदस्यावर...

209 बळी घेणाऱ्या साखळी बॉम्बस्फोटांतील ११ आरोपींची 19 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

मुंबई | नगर सह्याद्री:- मुंबईच्या पश्चिम उपनगरीय रेल्वेमार्गावर 2006 रोजी 11 मिनिटांत सात ठिकाणी झालेल्या...