spot_img
ब्रेकिंगवीज पडून नऊ जणांचा मृत्यू; महिला आणि लहान मुलांचा समावेश, कुठे घडली...

वीज पडून नऊ जणांचा मृत्यू; महिला आणि लहान मुलांचा समावेश, कुठे घडली घटना पहा

spot_img

नवी दिल्ली / वृत्तसंस्था –
ओडिशाच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वीज कोसळून ६ महिलांसह किमान ९ जणांचा मृत्यू झाला. राज्यात मुसळधार पाऊस आणि वादळाच्या दरम्यान हे अपघात घडले. काही लोक जखमीही झाले आहेत. कोरापुट जिल्ह्यातील पारिडीगुडा गावात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. हे लोक शेतात काम करत होते आणि पावसामुळे तात्पुरत्या झोपडीत थांबले होते. याचदरम्यान थेट झोपडीवर वीज कोसळल्याने दुर्घटना घडली.

कोरापुत जिल्ह्यात 3 लोक मरण पावले, जाजपूर आणि गंजममध्ये 2-2 लोक मरण पावले आहेत. त्याच वेळी धेंकनल आणि गजपती जिल्ह्यात 1-1 लोक मरण पावले आहेत. मरण पावलेल्यांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे.

जाजपूर जिल्ह्यातील धर्मशाळा परिसरात मुसळधार वादळ आणि पावसात तारे हेम्ब्रम आणि तुकुलू चत्तर नावाच्या दोन मुलांचा मृत्यू झाला. दोन्ही मुले जनापूर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बुरुसाही गावातील रहिवासी होती. ते एका मातीच्या घराच्या व्हरांड्यात उभे होते, तेव्हा त्यांच्यावर वीज कोसळली. दोघांचाही जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत आणि गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

गंजम जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये कबी सूर्यनगर तहसीलमधील बरीदा गावात ओम प्रकाश प्रधान नावाच्या विद्यार्थ्याचा वीज पडून मृत्यू झाला. त्याच वेळी, बेलगुथ परिसरात आंब्याच्या बागेत आंबे वेचताना वीज पडून एका तरुणीचा मृत्यू झाला. ढेंकनाल आणि गजपती येथेही मृत्यू झाले आहेत.

ढेंकनाल जिल्ह्यातील कुसुमुडिया गावात वीज पडून सुरुशी बिश्वाल नावाच्या महिलेचा मृत्यू झाला. तर, गजपती जिल्ह्यातील मोहन भागात एका महिलेचा ट्रॅक्टरमधून विटा उतरवत असताना वीज पडून मृत्यू झाला. या घटनेनंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयांनी मृतांच्या कुटुंबियांना सरकारच्या विद्यमान धोरणानुसार आर्थिक मदत दिली जाईल,असे सांगितले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

संगमनेरचे नाव देशात उंचावणाऱ्यांचा अभिमान: आ. तांबे

संगमनेर | नगर सह्याद्री नुकत्याच पार पडलेल्या सातव्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये संगमनेरच्या खेळाडूंनी...

आगामी निवडणुकीचा निर्णय स्थानिक पातळीवर; उपमुख्यमंत्री अजित पवार नेमकं काय म्हणाले? वाचा

पुणे । नगर सहयाद्री स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात येईल, मुंबईबाबतचा...

जीएस महानगर बँक निवडणुकीसाठी चिन्ह वाटप जाहीर; कुणाला मिळाली ‘रिक्षा’तर कुणाला मिळाली ‘कपबशी’, वाचा सविस्तर

मुंबई | नगर सह्याद्री जीएस महानगर बँकेच्या संचालक मंडळाच्या 1 जून रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारांना...

अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा हाहाकार! शेतकरी आर्थिक संकटात

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मागील आठ दिवसांपासून शहरासह जिल्हाभरात ढगाळ वातावरण पसरले होते. रविवारी...