spot_img
अहमदनगर'निळवंडे' ५१ टक्के भरले; भंडारदरा कधी 'ओव्हर फ्लो' होणार, वाचा अपडेट

‘निळवंडे’ ५१ टक्के भरले; भंडारदरा कधी ‘ओव्हर फ्लो’ होणार, वाचा अपडेट

spot_img

अकोले । नगर सहयाद्री:-
भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रातील घाटघर, रतनवाडी, पांजरे आदी परिसरात दमदार आषाढ सरी कोसळू लागल्याने धरणात नवीन पाण्याची आवकही कमालीची वाढली आहे. यामुळे मंगळवारी सायंकाळी ६ वाजता भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ६७३२ दलघफू (६०.५८ टक्के) तर निळवंडेचा ४२५८ दलघफू (५१.१३ टक्के) झाला आहे. आढळा धरणही लवकरच पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर असून, ९९१ दलघफू (९३.४९ टक्के) पाणीसाठा झाला आहे.

दोन दिवसांपासून पाणलोटक्षेत्रात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे भंडारदरा मध्ये मंगळवारी ६ वाजेपर्यंत ३५९ दलघफू नवीन पाणी जमा झाले. तर निळवंडेत १७९ दलघफू नवीन पाणी दाखल झाले. तसेच वाकी तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला असल्याने कृष्णावंती नदी वाहती आहे. दरवर्षी, १५ ऑगस्ट पर्यंत भंडारदरा धरण भरत असते, परंतु यंदा जुलै महिन्यातच दोन्ही धरणे ओव्हर फ्लो होण्याची शयता आहे.

जायकवाडीमधेही ६० टक्के साठा
गोदावरीच्या लाभक्षेत्रातही जोरदार पाऊस सुरु आहे. दारणा, गंगापूर धरणातही पाणीसाठा वाढला आहे. जयकवाडीकडेही गोदावरीतून विसर्ग होत असल्याने जायकवाडी जलाशयात मंगळवारी सायंकाळी ६ वाजता उपयुक्त साठा ४४.६४ टक्के इतका झाला होता. जायकवाडीत मंगळवारी सायंकाळच्या आकडेवारीनुसार मृतसह एकूण साठा ६०.३० टक्के इतका साठा आहे, उपयुक्त साठा ४४.६४ टक्के इतका झाला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जरांगेंसह मराठ्यांच्या रोषाचे धनी देवेंद्र फडणवीस?

आंदोलनाची व्याप्ती वाढत चालल्याने देवाभाऊंसह गृहखात्याची संपूर्ण यंत्रणा सपशेल अपयशी | जरांगे पाटलांची मुख्य...

‘आंदोलनाला परवानगी दिलीच कशी?’ हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल, कोर्टात नेमकं काय घडलं? दिला मोठा आदेश

मुंबई / नगर सह्याद्री - Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी मुंबईत आझाद मैदान येथे मनोज...

आंदोलनावर तोडगा न निघाल्यास…; पारनेर तालुक्यातील सकल मराठा समाजाचा इशारा..

पारनेर | नगर सह्याद्री मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलनाचे नेते...

सीएसएमटी स्थानकात आंदोलकांचा गोंधळ!, लोकल अडवली, पुढे नेमकं काय घडलं?

रुळावर उतरून लोकल अडवली | चौथ्या दिवशी आंदोलन तीव्र मुंबई | नगर सह्याद्री मराठा आरक्षणाचा मुद्दा...