spot_img
ब्रेकिंग'निघोजे' ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाविरोधात चिट्ठी लिहून तरुणांची आत्महत्या, नेमकं प्रकरण काय?

‘निघोजे’ ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाविरोधात चिट्ठी लिहून तरुणांची आत्महत्या, नेमकं प्रकरण काय?

spot_img

Crime News: खेड तालुक्यातील दौंडकरवाडीमधील व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने मानसिक त्रास देणाऱ्या ग्रामसेवकाविरोधात चिठ्ठी लिहून ठेवली होती. रमेश मच्छिंद्र मोहिते (वय ४५) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याप्रकरणी आकाश रमेश मोहिते (वय २४, रा. दौंडकरवाडी, ता. खेड) यांच्या फिर्यादीवरून ग्रामसेवक विष्णू लक्ष्मण गाडीलकर (रा. शिरूर), भास्कर जाधव, विलास भास्कर जाधव, संजय भीमराव जाधव, रुपेश दौंडकर, एक अनोळखी व्यक्ती आणि दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दौंडकरवाडी येथे रमेश मोहिते यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी दोन चिठ्ठया लीहल्या होत्या. एक चिठ्ठी त्याने निघोजे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक विष्णू गाडीलकर यांच्या विरोधात तर दुसरी भाऊ विकास यांच्या सासरकडील लोकांच्या विरोधात होती.

पहिल्या चिठ्ठीत निघोजे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक विष्णू गाडीलकर यांनी केलेल्या कामाचे दीड लाख रुपये दिले नाहीत. ते मागितले असता देणार नाही असे म्हणत तुमचे कुटुंब बरबाद करीन अशा आशयाचा मजकुर लिहला होता.

तर दुसऱ्या चिठ्ठीत फिर्यादींचा भाऊ विकास यांच्या सासरकडील लोकांनी भाऊ विकास आणि वडील रमेश यांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे म्हटले आहे. या दोन्ही कारणांवरून आपण आत्महत्या करत असल्याचे रमेश यांच्या खिशात आढळलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

एमआयडीसीत बाप्पाला निरोप; पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात रंगली विसर्जन मिरवणुक

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - एमआयडीसी परिसरात गेल्या सात दिवसांपासून सुरु असलेला गणेशोत्सव मंगलमय...

मनपा प्रारूप प्रभाग रचनेवर ठाकरे शिवसेना हरकती घेणार : शहरप्रमुख काळे

इच्छुकांची चाचपणी सुरू, आघाडी बाबत योग्य वेळी निर्णय घेऊ अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर...

बिबट्याच्या हल्ल्यात पारनेर तालुक्यात 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

  कळस परिसरात ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाकडे तातडीने कारवाईची मागणी गणेश जगदाळे / नगर सह्याद्री : पारनेर...

सरकार झुकलं! मागण्या मान्य पण जरांगे पाटलांनी पुन्हा सरकारला दिला ‘हा’ इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - मनोज जरांगे यांच्या मागण्याचा सरकारकडून जीआर काढण्यात आला आहे....