spot_img
ब्रेकिंगपुढील ४८ तास धोक्याचे! 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, हवामान विभागाची मोठी...

पुढील ४८ तास धोक्याचे! ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, हवामान विभागाची मोठी…

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
महाराष्ट्रात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत मुसळधार पावसाने जोर धरला असून, भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) आगामी 48 तासांत तुफान पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज रविवारी मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, ठाणे, आणि पालघर जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, राज्यभरात पुढील चार दिवसांत पावसाची स्थिती कायम राहील. हवामानतज्ज्ञ के.एस. होसळीकर यांनी सांगितले आहे की, मराठवाडा आणि विदर्भात तुफान पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, आणि परभणीत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडेल.

विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वाशिम, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यांतही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे, आणि जळगाव जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासह घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता आहे.

मुंबई आणि पुण्यात रविवारी पहाटेपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली असून, येत्या काही तासांत पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले असून, गरज असल्यासच घराबाहेर पडावे असे सांगितले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला! दिल्ली, मुंबई आणि झारखंडमध्ये एकाचवेळी छापा; ५ दहशतवाद्यांना अटक

मुंबई । नगर सहयाद्री:- देशभरात पसरलेल्या दहशतवादी नेटवर्कवर मोठी कारवाई करत दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्ष...

लाडक्या बहिणींना आनंद वार्ता!, ऑगस्टचा हप्ता खात्यात खटाखट जमा

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट...

दोन लाख लंपास, बांधकाम व्यावसायिकाला धमकी तर चुलत्याला पुतण्यांची मारहाण; वाचा अहिल्यानगर क्राईम

Ahilyanagar Crime: शहरातील भवानी नगर येथील एका बांधकाम व्यावसायिकाला तलवारीने जीवे मारण्याची धमकी देत...

परतीच्या पावसाचा जोर वाढणार; २५ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा, वाचा सविस्तर

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यात सध्या पावसाचा खंड जाणवत असून शेतकऱ्यांच्या नजरा आता परतीच्या...