spot_img
देशआरएसएसचा नवा प्लॅन...; अब की बार गडकरी सरकार?

आरएसएसचा नवा प्लॅन…; अब की बार गडकरी सरकार?

spot_img

नागपूर | वृत्तसंस्था
लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसला आहे. मात्र, नागपूर लोकसभा मतदारसंघातून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी तब्बल १ लाखाहून अधिक मताधिक्क्याने विजय मिळवला आहे. यानंतर आता संघ वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. संघ पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी नाही तर नितीन गडकरींना पंतप्रधान करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

स्पष्ट बहुमत मिळवण्यासाठी भाजपची धडपड सुरू असतानाच नितीन गडकरी पंतप्रधान होणार असल्याची शयता वर्तवली जात आहे. गडकरींचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत. योगायोगाने त्यांच्या लोकसभा मतदारसंघात आरएसएसचे मुख्यालयही आहे. यावर्षी गडकरी नव्या संकल्पासह प्रचारात उतरले होते. नितीन गडकरी हे भाजपचे एक असे नेते आहे ज्यांना नावाला काही विरोधी पक्षांचाही पाठिंबा मिळू शकतो. शिवसेना उबाठाही नितीन गडकरींच्या नावाला पाठिंबा देण्याची शयता आहे. महाराष्ट्राचा पंतप्रधान या अटीवर शिवसेना उबाठा पक्ष पुन्हा एनडीएसोबत येऊ शकतो. यामुळे काँग्रेस आणि शरद पवारांच्या एकूण रणनितीला छेद देता येईल. निवडणुकीनंतर, संजय राऊत यांनी गडकरींवरुन देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला होता. फडणवीसांना नितीन गडकरींना पराभूत करायचं होतं असं ते म्हणाले होते.

२०१४ मध्ये जेव्हा नितीन गडकरींनी पहिल्यांदा नागपूरची जागा जिंकली, तेव्हा त्याचे श्रेय काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांनी मोदी लाटेला दिले होते. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले यांचा पराभव केला. पण, २०१४ च्या तुलनेत त्यांच्या मताधिक्क्यामध्ये घसरण झाली होती. आथा तिसर्‍या टर्मच्या आव्हानाचा सामना करताना गडकरींवर केवळ जिंकण्याचेच नव्हे तर विजयाचे अंतर वाढवण्याचेही दडपण होते.

निवडणुकीपूर्वी गडकरींनी ’काम करणार्‍यांना कमी प्रसिद्धी मिळते,’ अशी टीका केली.भाजप बहुमताचा आकडा गाठण्यात कमी पडल्याने, नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या तिसर्‍या कार्यकाळावर प्रश्न निर्माण होतात दिसत आहे. विशेषत: त्यांनी कधीही अल्पमतातल्या सरकारचे नेतृत्व केलेले नाही. लोकसभा निवडणुकीतील निराशाजनक निकालानंतर आरएसएस यावर विचार करु शकते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...