पारनेर | नगर सह्याद्री
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी अभियानाला पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातून उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर यांनी आमदार काशिनाथ दाते आणि जिल्हा अध्यक्ष अशोक सावंत यांच्या नेतृत्वाखाली पक्ष बांधणी आणि विस्ताराला गती दिली आहे. या अभियानाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना पक्षाशी जोडण्याचा आणि पक्ष संघटनेची ताकद वाढवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
टाकळी ढोकेश्वर गटातील भोंद्रे, काकणेवाडी, तिखोल, ढोकी आणि टाकळी ढोकेश्वर या गावांमध्ये सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ आमदार काशिनाथ दाते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या प्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष रखमाजी कापसे, महिला तालुकाध्यक्षा सुषमा रावडे, युवक तालुका अध्यक्ष भास्कर उचाळे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षाच्या स्थानिक पातळीवरील बांधणीला बळ मिळेल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
या अभियानाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना पक्षाच्या विचारधारेशी आणि कार्याशी जोडण्यावर भर देण्यात येत आहे. सभासद नोंदणीमुळे पक्षाची ग्रामीण भागातील ताकद वाढणार असून, कार्यकर्त्यांना नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळणार आहे. पारनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यापूवही जनतेच्या प्रश्नांसाठी सक्रिय भूमिका घेतली आहे. याच धतवर, या अभियानातून पक्षाला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर यांनी व्यक्त केला. त्यांनी कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त सभासद जोडण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांनी गावागावांत सभासद नोंदणीला गती देण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी ग्रामस्थांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेत पक्षाच्या या उपक्रमाचे स्वागत केले. सभासद नोंदणी अभियानामुळे पारनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढण्यास मदत होईल, असा आशावाद व्यक्त होत आहे. येत्या काळात तालुक्यातील इतर गटांमध्येही हे अभियान राबवले जाणार आहे. यापूव पारनेर तालुक्यात आमदार काशिनाथ दाते यांच्या नेतृत्वाखाली आयोजित जनता दरबारातही नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न झाला होता. त्या धतवर, सभासद नोंदणी अभियान हे पक्षाला जनमानसात अधिक जवळ आणण्याचा आणि सामान्य लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा एक महत्त्वाचा टप्पा आहे.