spot_img
ब्रेकिंगराष्ट्रवादीची ताकद वाढणार; 'या' ४ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश होणार?

राष्ट्रवादीची ताकद वाढणार; ‘या’ ४ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश होणार?

spot_img

Politics News: सांगली जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हं आहेत. जिल्ह्यातील चार माजी आमदार आणि जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्यात अजित पवार गटाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

या नेत्यांमध्ये माजी मंत्री शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, विलासराव जगताप, राजेंद्रअण्णा देशमुख आणि रवी तमनगौडा पाटील यांचा समावेश आहे. यापैकी काहीजण शरद पवार यांच्या गटात होते, काही भाजपमधून बाहेर पडले, तर काही राजकीयदृष्ट्या निष्क्रिय होते. आता हे सर्वजण राष्ट्रवादी अजित पवार गटात सक्रिय होत असल्याने जिल्ह्यातील समीकरणं पूर्णपणे बदलू शकतात.

या नेत्यांनी गेल्या काही दिवसांत मिरज परिसरात अनेक बैठकांचे आयोजन केले होते. आपल्या राजकीय भवितव्यासाठी योग्य पक्ष निवडण्याचा विचार सुरू असताना अखेर त्यांनी अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील मतदारसंघांमध्ये याचा निश्चितच परिणाम होणार असल्याची चर्चा आहे.

रवी तमनगौडा पाटील हे भाजपमधील माजी नेते होते. जतमधून उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात अपक्ष लढत दिली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. आता त्यांनीही अजित पवार गटात प्रवेश घेतल्याने भाजपला धक्का बसल्याचं चित्र आहे.

या पाचही नेत्यांचा प्रवेश म्हणजे सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे.राष्ट्रवादीच्या विभाजनावेळी जिल्ह्यात एकही मोठा नेता अजित पवार यांच्यासोबत गेला नव्हता. आता मात्र चार माजी आमदार आणि अन्य स्थानिक नेत्यांच्या प्रवेशामुळे गटाची ताकद वाढणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक! चारित्र्याच्या संशयातून मुलीसमोरच आईची केली हत्या

अकोला / नगर सह्याद्री - अकोला शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चारित्र्याच्या...

मुली गरिबांना द्या, श्रीमंतांच्या नादी लागू नका हो!:गौरी गर्जेच्या वडिलांनी फोडला टाहो..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे यांच्या...

सिनेसृष्टीवर राज्य करणारा कोहिनूर हरपला; सुपरस्टार धर्मेंद्र यांच निधन

मुंबई । नगर सहयाद्री :- धर्मेंद्र यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही...

लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज; प्रशासनाकडून हिरवा कंदील, आता डबल गिफ्ट मिळणार?

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा’लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया...