spot_img
राजकारणराष्ट्रवादीचे नवाब मलिक आले परंतु कार्यालयात मात्र 'यांच्या' गेले..चर्चांना उधाण

राष्ट्रवादीचे नवाब मलिक आले परंतु कार्यालयात मात्र ‘यांच्या’ गेले..चर्चांना उधाण

spot_img

नगर सह्याद्री / नागपूर : नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होतेय. २० डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालेल. या अधिवेशनात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक हेदेखील असणार आहेत.

परंतु सध्या एका घटनेने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याचे झाले असे की, नवाब मलिक अधिवेशनासाठी नुकतेच विधानभवन परिसरात दाखल झाले व ते अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री अनिल पाटील यांच्या कार्यालयात गेलेले दिसले. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

नवाब मलिक शरद पवार गटाला पाठिंबा देणार की अजित पवार गटाला याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. सुप्रीम कोर्टाकडून मिळालेल्या जामिनानंतर तुरुंगातून बाहेर आलेले नवाब मलिक हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात जाणार की शरद पवार गटात जाणार याबाबत निश्चितता नव्हती. ईडीकडून करण्यात आलेल्या अटकेनंतर गेल्या अनेक महिन्यांपासून सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर गेलेले मलिक हे सध्या जामिनावर बाहेर असून अनेक दिवसांनी ते सभागृहात दिसतील.

दरम्यान, विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर द्या. आपसात समन्वय ठेवा. कोणत्याही पद्धतीने सरकारवर नामुष्की येणार नाही याची काळजी घ्या, असा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी सहकारी मंत्र्यांना दिला. दोन्ही सभागृहात मंत्री नसल्यामुळे कामकाज तहकूब करावे लागण्याची पाळी सरकारवर गेल्या अधिवेशनात तीन-चार वेळा आली होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; पहा कुठे कोसळला?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री दुष्काळाचे सावट असणार्‍या नगर जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली....

अहिल्यानगर जिल्ह्यात यंदाही मुलींनी मारली बाजी; किती टक्के लागला निकाल, वाचा सविस्तर

अहिल्यानगर । नघतर सहयाद्री:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेचा राज्याचा...

नहाटाने इंजिनिअरला फसवले; एक कोटीचे प्रकरण काय?, वाचा सविस्तर

पुणे । नगर सहयाद्री:- सरकारी मॅग्नेट प्रोजेक्टच्या नावाखाली सॉफ्टवेअर इंजिनिअरची 2 कोटी 60 लाख...

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठक जिल्हा विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरेल; मंत्री विखे

अहील्यानगर । नगर सहयाद्री:- चौंडी येथे मंत्रीमंडळाची प्रथमच होत असलेली बैठक जिल्ह्याच्या दृष्टीने एैतिहासिक...