spot_img
देशएनआयएकडून देशभरात छापेमारी! नेमकं कारण काय?

एनआयएकडून देशभरात छापेमारी! नेमकं कारण काय?

spot_img

नवी दिल्ली
राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून देशभरातील जवळपास ११ ठिकाणी छापेमारी केल्याची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफे बाँम्बस्फोट प्रकरणात ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. एनआय या वृत्तसंस्थेने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

१ मार्च रोजी बेंगळुरू येथील रामेश्वरम कॅफेत भीषण स्फोट झाला होता. याच संदर्भात चौकशीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने विविध राज्यांमध्ये छापे टाकले. या प्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी ही छापेमारी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या स्फोट प्रकरणात मुसावीर हुसेन शाजीब आणि स्फोटामागील सूत्रधार अब्दुल मतीन ताहा या दोघांना याआधीच अटक करण्यात आली आहे. या दोघांच्या चौकशीमध्ये समोर आलेल्या माहितीवरुन ही छापेमारी केल्याचे सांगण्यात येत आहे. या छापेमारीच्या ठिकाणांबाबत तपास यंत्रणेने गुप्तता पाळली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...