spot_img
ब्रेकिंगराष्ट्रवादीच ठरलं! अजित पवार गट 'इतक्या' जागांवर विधानसभा निवडणूक लढणार

राष्ट्रवादीच ठरलं! अजित पवार गट ‘इतक्या’ जागांवर विधानसभा निवडणूक लढणार

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
विधानसभेचे बिगुल वाजणार असून सर्वच पक्षानीनिवडणुकीसाठी कंबर कसली आहे. महायुतीमध्ये जागा वाटपावरुन रस्सीखेच सुरू आहे. विधानसभेच्या जागांसाठी शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्षामध्ये कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी जागा वाटपाबाबत सर्वात महत्वाचे विधान केले आहे.

विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला जवळपास ६० जागा मिळतील, असे सर्वात महत्वाचे विधान अजित पवार यांनी केले आहे. युवक राष्ट्रवादीच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अजित पवार यांनी आपण ६० एक जागा लढवणार असल्याचे म्हटले आहे.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?
आपल्याला तीन वेगवेगळ्या पद्धतीने काम करायचे आहे. तुम्हाला आम्ही तशी यादी देऊ. तुम्ही अजितबात गाफील राहू नका. आपल्याला न मिळणाऱ्या जागेवर शक्ती खर्च करु नका. संवाद साधताना आपलेपणाने बोला. शांतपणाने, डोक्यावर बर्फ ठेऊन संवाद साधा. उगाच बाहेर काढा रे त्याला, असं करु नका. बाहेर काढा म्हणल्यावर आपल्यालाच बाहेर जावं लागेल. कृपा करुन काम करा, दुर्लक्ष करु नका,” असे अजित पवार यावेळी म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला! दिल्ली, मुंबई आणि झारखंडमध्ये एकाचवेळी छापा; ५ दहशतवाद्यांना अटक

मुंबई । नगर सहयाद्री:- देशभरात पसरलेल्या दहशतवादी नेटवर्कवर मोठी कारवाई करत दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्ष...

लाडक्या बहिणींना आनंद वार्ता!, ऑगस्टचा हप्ता खात्यात खटाखट जमा

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट...

दोन लाख लंपास, बांधकाम व्यावसायिकाला धमकी तर चुलत्याला पुतण्यांची मारहाण; वाचा अहिल्यानगर क्राईम

Ahilyanagar Crime: शहरातील भवानी नगर येथील एका बांधकाम व्यावसायिकाला तलवारीने जीवे मारण्याची धमकी देत...

परतीच्या पावसाचा जोर वाढणार; २५ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा, वाचा सविस्तर

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यात सध्या पावसाचा खंड जाणवत असून शेतकऱ्यांच्या नजरा आता परतीच्या...