spot_img
अहमदनगरAhmednagar News Today: आयत्या बिळावर नागोबा!! शेतमाल चोरणारी टोळी गजाआड, 'असा' लावला...

Ahmednagar News Today: आयत्या बिळावर नागोबा!! शेतमाल चोरणारी टोळी गजाआड, ‘असा’ लावला सापळा

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
काबाड कष्ट करून शेतकर्यांनी पिकवलेल्या शेतमाल चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली. या कारवाईत पोलिसांनी सात आरोपी अटक केले असून, ९ लाख २६ हजारांचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत केला आहे.

वैभव उर्फ बाल्या सुरेश औटी, अमोल संतोष माळी, (दोघे रा. जामगाव ता. पारनेर), रोहित सुनील शेळके (रा. लोणी हवेली, ता. पारनेर), आकाश अजिनाथ गोलवड, विकास विठ्ठल घावटे, संदीप उत्तम गोरे (तिघे रा. जामगाव, ता. पारनेर), किरण संजय बर्डे, (रा. शिरुर जि. पुणे), साहील नामदेव माळी, (रा. जामगाव ता. पारनेर) असे आरोपींची नावे आहेत.

श्रीगोंदे तालुयातील शेतकर्‍यांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली होती. याबाबत ऋषिकेश देविदास लगड (रा. कोळगाव, ता. श्रीगोंदा) यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा वैभव औटी याने केला असल्याचे खात्रीशीर समजले. तो जामगाव ते पारनेर रस्त्याने जात असल्याचीही माहिती मिळाली. पो. नि. आहेर यांनी तत्काळ एक पथक रवाना करून जामगाव घाटात सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले.

ही कारवाई गुन्हे शाखेतील सफौ. भाऊसाहेब काळे, दत्तात्रय हिंगडे, संदीप पवार, रवींद्र कर्डिले, फुरकान शेख, संतोष खैरे, रणजित जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, सागर ससाणे, मेघराज कोल्हे, अरुण मोरे यांच्या पथकाने केली. पोलिसांनी आरोपींकडून ९६ हजार रुपये किमतीची १२ क्विंटल पांढरी तूर, ३० हजार रुपये किमतीची ६ क्विंटल सोयाबीन, ८ लाख रुपये किमतीचा चार चाकी टेम्पो असा ९ लाख २६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ताब्यात घेतलेल्या आरोपींना बेलवंडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर तालुक्यात बिबट्याची भीती; गावांना दिवसा वीज पुरवठा करावा

माजी सभापती अभिलाष घिगे, सरपंच भाऊसाहेब बहिरट यांची महावितरणकडे मागणी सुनील चोभे | नगर सह्याद्री गेल्या...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भिजतं घोंगडं; याचिकेवर ‘या’ तारखेला सुनावणी होणार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षणाच्या मर्यादेबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत मोठी...

कांद्याला भावच नाही, शेतकऱ्याने काय केले पहा…

रांधेतील शेतकर्‍याने कांद्याला भाव नसल्याने पीक केले नष्ट पारनेर | नगर सह्याद्री गेल्या वर्षभरात कांद्याला सरकारने...

अजित पवार.. सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाय!; महाराष्ट्रात राजकारण तापले, माफीनामा अन कोण काय म्हणाले..

माजी आमदारपुत्राचं उपमुख्यमंत्र्यांना आव्हान; सोलापुरात वातावरण तापलं सोलापूर | नगर सह्याद्री सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुयातील अनगर...