spot_img
अहमदनगरशिवस्वराज्य यात्रेत खासदार 'कोल्हे' यांच्याकडून माजी आमदार 'जगताप' यांचे कौतुक! बुलडोजर फिरवला...

शिवस्वराज्य यात्रेत खासदार ‘कोल्हे’ यांच्याकडून माजी आमदार ‘जगताप’ यांचे कौतुक! बुलडोजर फिरवला तरी पवार साहेबांना सोडणार?

spot_img

Politics News: जिल्हा बँकेचे ( District Bank ) कर्ज घेण्यासाठी राज्यातील अनेक कारखानदार सरकारच्या राजकीय आमिषाला बळी पडले. सरकारच्या पक्षात सामिल झाले. पण श्रीगोंद्याचे माजी आमदार राहूल जगताप ( Rahul Jagtap) यांचा अभिमान आहे, त्यांनी सत्तेपुढे मान झुकवली नाही. अशा शब्दात खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe ) यांनी राहूल जगताप यांचे कौतुक करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली.

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेचे गुरुवार दि.२६ रोजी रात्री उशिरा आगमन झाले. परंतु सभेसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील, खासदार अमोल कोल्हे, खासदार नीलेश लंके, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, अतुल लोखंडे, दीपकपाटील भोसले, हरिदास शिर्के, केशवराव मगर, जिजाबापु शिंदे आदी उपस्थितीत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस होते.

यावेळी खासदार कोल्हे म्हणाले, राज्यातील अनेक कारखान्यांना थकहमी देण्यात आली. कर्ज बसत नसतानाही काही कारखान्यांना कर्ज देण्यात आले. पण कुकडी सहकारी साखर कारखाना, घोडगंगा सहकारी साखर कारखाना यांनानियमात असतानाही कर्ज नाकारण्यात आले. ज्यांनी फाईल अडवली त्यांनी त्यांना काय हवे होते? हे सगळ्यांना माहिती आहे. पण आम्हाला राहूल दादा जगताप यांचा अभिमान आहे. त्यांनी साहेबांची साथ सोडली नाही. सरकारच्या सत्तेपुढे मान झुकवली नाही. आता आगामी विधानसभा निवडणूकीत ते दाखवून द्यायचे आहे. अनेक प्रलोभने येतील, अनेक मतमंतात्तरे होती, पण शेतकऱ्यांचे भले करणारे, महाराष्ट्राचा स्वाभीमान जपणारे, तरुणांचे हित जोपासणारे सरकार सत्तेत यावे. त्यासाठी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखालील महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आणा आणि त्यासाठी श्रीगोंद्यातून महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकुन द्या असे आवाहन कोल्हे यांनी केले.

जनतेच्या मनातीलच उमेदवार असणार; जयंत पाटील ( प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्ष)  
एकदा लाट आली की, पैशाला महत्व नसते. तुम्ही ते लोकसभेला दाखवून दिले. मतदारांच्या मनात जे असते तेच मतदार करून दाखवितात. लोकसभेत ते मतदारांनी दाखविले आहे. आम्हाल मानणाऱ्या नेत्यांचे कारखान्यांना कर्ज देताना खड्‌यासारखे बाजूला काढले. आता निगेटिव्ह मुद्दा राहिलेला नाही. पण शरद पवार यांनी आता कुकडीचा प्रश्न सोडला आहे. त्यामुळे तुमच्या मनात जो आहे तोच येथील उमेदवार असेल, काळजी करु नका असे सांगत जयंत पाटील यांनी अप्रत्यक्षपणे राहूल जगताप यांना पसंती दिली.  

बुलडोजर फिरवला तरी पवार साहेबांना सोडणार
जिल्हा बँकेचे कर्ज कुकडी कारखान्याला मिळत होते. पण आम्ही साहेबांसोबत आहोत म्हणून आम्हाला डावलले गले. पण आम्ही साहेबांची साथ सोडली नाही, आन सोडणार नाही. कुकडीची अडचण पवार साहेबांनीच सोडवली असून येत्या ५ आक्टोंबरपर्यंत सगळी थकीत देणी अदा करण्यात येणार आहे. आमच्यावर बुल डोजर जरी फिरवला तरी आम्ही पवार साहेबांना सोडणार नाही. विधानसभेला ५० हजार मतांचे लिड घेवून महाविकार आघाडीचा उमेदवार जिंकेल असा
विश्वास माजी आमदार राहूल जगताप यांनी व्यक्त केला. 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...