spot_img
महाराष्ट्रघरात पैसास टिकत नाही? गुरुवारी करा 'या' झाडाची पूजा!

घरात पैसास टिकत नाही? गुरुवारी करा ‘या’ झाडाची पूजा!

spot_img

Vastu Tips: अनेक झाडे आणि वनस्पतींना पवित्र मानले गेले आहे. पिंपळ, तुळशी, केळी, आवळा, शमी यांसारखी झाडे आणि वनस्पती त्यांच्यात विशेष आहेत. असे मानले जाते की अशा पवित्र वृक्ष आणि वनस्पतींवर देवी-देवता वास करतात. या झाडांची काळजी घेणे आणि त्यांची पूजा करणे खूप शुभ मानले जाते.

पुराणातही केळीच्या झाडाचे तपशीलवार वर्णन केले आहे. जगाचे पालनहर्ता भगवान विष्णू या वृक्षात वास करतात असे म्हणतात. ज्यामध्ये त्याचे मूळ आणि पाने हे देव गुरु बृहस्पतीचे निवासस्थान मानले जातात.

गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा केल्याने लोकांच्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. आज आम्ही तुम्हाला केळीच्या झाडाशी संबंधित काही खास उपाय सांगणार आहोत.

आर्थिक संकट होईल दूर
कष्ट करूनही जर गरिबी घर सोडण्याचे नाव घेत नसेल तर केळीच्या झाडाचा उपाय तुमचा कायापालट करू शकतो. यासाठी केळीच्या झाडाची मुळे घरी आणा. यानंतर ते मुळ गंगेच्या पाण्याने धुवून त्यावर पिवळा धागा बांधावा. नंतर घरामध्ये ज्या ठिकाणी पैसा ठेवला आहे त्या ठिकाणी हे मूळ ठेवा. याचा तुम्हाला खूप फायदा होईल.

वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात-
जर आपल्या कुंडलीत गुरुची स्थिती खराब असल्यास आणि आपल्या वैवाहिक जीवनात अडथळे येत असल्यास आपण एखाद्या ज्योतिषाला विचारून बृहस्पती देवाचे उपवास करावे आणि केळीच्या झाडाची पूजा करावी. असे केल्यानं आपल्या कुंडलीत असलेले गुरु ग्रह बळकट होतील, आणि लग्नातील अडथळे दूर होतील.

केळीच्या झाडा खाली दिवा लावा-
श्री विष्णू पिवळे कपडे घालतात. म्हणून त्यांना पीताम्बरधारी देखील म्हणतात. गुरुवारी पिवळे कपडे घालून केळीच्या झाडा खाली दिवा लावावा. असे केल्यानं श्री विष्णूंची कृपादृष्टी मिळते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री सरसावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला ; प्रशासनाला दिले असे आदेश

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील...

पुढचे २४ तास अलर्ट राहा! या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस

मुंबई / नगर सह्याद्री राज्यात कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून महाराष्ट्रात अनेक...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पवार आक्रमक; देवभाऊंवर साधला निशाणा, म्हणाले आता आम्ही…

नाशिक / नगर सह्याद्री गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात २,००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या...

खासदार निलेश लंके धावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला; काय केले पहा

खा. नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर / नगर सह्याद्री - गेल्या तीन ते...