spot_img
महाराष्ट्रआमदार काशिनाथ दाते यांनी शब्द पाळला! शेतकऱ्यांमध्ये 'समाधान'

आमदार काशिनाथ दाते यांनी शब्द पाळला! शेतकऱ्यांमध्ये ‘समाधान’

spot_img

निघोज । नगर सहयाद्री:-
कुकडीच्या डाव्या कालव्याला आवर्तन सोडल्याने लाभधारक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच आ. काशिनाथ दाते यांनी शब्द पाळल्याने शेतकऱ्यांनी धन्यवाद व्यक्त केले.

कुकडी डावा कालवा लाभधारक परिसरात कांदा पिकाची लागवड सध्या मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे पाण्याची टंचाई जाणवू लागली होती. त्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांनी आवर्तन सोडण्याची मागणी आमदार काशिनाथ दाते यांच्याकडे केली होती.

आमदार दाते यांनी लगेच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांची मुंबईत भेट घेऊन कुकडी डावा कालव्याला आवर्तन सोडण्याची मागणी केली.

संबधीतांनी लगेच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करीत पाणी सोडण्याची सुचना केली होती. बरोबर दि.१० रोजी पाणी सोडण्यात आले असून याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार सत्यजित तांबे यांची मोठी मागणी; वकीलबांधवांसाठी ‘तो’ कायदा लागू करा

Satyajit Tambe: नाशिक जिल्ह्यातील माडसांगवी येथे ॲड. रामेश्वर बोऱ्हाडे यांच्यावर नुकताच प्राणघातक हल्ला झाला....

शहर हादरलं! सरफिऱ्या पतीचे धक्कादायक कृत्य, चार्जरच्या वायरने पत्नीचा गळा आवळला..

Maharashtra Crime News: कौटुंबिक कलहातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. चार्जिंगच्या वायरने नवऱ्याने...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींसाठी ‘मंगळवार’ कसा? पहा..

मुंबई । नगर सह्याद्री –  मेष राशी भविष्य दिवसाच्या सुरवातीत तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते...

श्रीगोंद्यात गुन्हेगारीचा कहर! महिलेच्या डोक्याला लावली पिस्तुल, पुढे घडलं असं काही..

श्रीगोंदा | नगर सह्याद्री तालुक्यातील वडाची वाडी येथे कोर्टातील दाव्याच्या कारणावरून एका महिलेस पिस्तुलाचा...