spot_img
ब्रेकिंगनगरच्या विकासासाठी पुन्हा 'गिफ्ट'! आमदार जगताप यांच्या पाठपुराव्यांमुळे 'या' कामासाठी ९४ कोटी...

नगरच्या विकासासाठी पुन्हा ‘गिफ्ट’! आमदार जगताप यांच्या पाठपुराव्यांमुळे ‘या’ कामासाठी ९४ कोटी मंजूर

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
नगरच्या विकासासाठी राज्यशासनाने नव्याने ९४ कोटींचा निधी मंजूर केला आहे. नगर शहरासह भिंगारचा विकास करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे बम्पर गिफ्ट दिले आहे. नगर शहरातील मूलभूत सोयी सुविधा, विकासकामांसाठी राज्य शासनाने ८५ कोटी रुपयांचा तर भिंगार शहरातील मूलभूत सोयी सुविधा विकासकामांसाठी ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे अशी माहिती आ. संग्राम जगताप यांनी दिली. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आ.संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निधीला मंजूरी दिली आहे. त्यामुळे नगर शहरासह भिंगारलाही आ. जगताप यांच्या माध्यमातून विकासकामांचे मोठे गिफ्ट मिळाले आहे. या निधीमुळे अनेक रस्त्यांचे भाग्य उजळणार असून नवीन उद्याने, क्रीडांगणे, चौक शुशोभीकरण तसेच अन्य विकासकामे होणार असल्याची माहिती आ. संग्राम जगताप यांनी दिली.

नगर शहरातील डीपी रस्त्यांसाठी नुकताच पहिल्या टप्यातील १५० कोटींचा निधी राज्य शासनाने मंजूर केला. त्यापाठोपाठ आता नगर शहरासाठी ८५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे नगर शहरात वेत्या काळात जवळपास २३५ कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लागणार आहेत. भिंगारसाठी प्रथमच राज्य शासनाकडून ९ कोटींचा भरीव निधी मिळाला आहे त्यामुळे भिंगारचाही कायापालट होण्यास मदत होणार आहे.

आ. जगतापांचा राजकीय निर्णय नगरसाठी लाभदायी
राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ झाली. त्यावेळी आ. संग्राम जगताप यांनी सुरुवातीपासूनच पवारांची साथ देण्याचा राजकीय निर्णय घेतला. त्यांनी घेतलेला निर्णय नगरसाठी लाभकारक ठरला आहे. पवारांनी आ. जगताप यांच्या प्रस्तावानुसार नगर शहराच्या विकासासाठी निधी देताना हात सैल सोडले आहेत. त्यामुळे शहराच्या विकासाला खर्‍या अर्थाने चालना मिळाली.

भिंगारचाही चेहरामोहरा येत्या काळात बदलेल
शहर छावणी परिषदेकडे असल्याने कोणताही प्रश्न सोडविण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. विकास करताना विविध परवानग्या मिळवताना थेट दिल्लीपर्यंत विषय जातो. अशावेळी भिंगारमध्ये काम करताना प्रचंड मेहनत करावी लागते. मी भिंगारकरांना शब्द दिलेला असल्याने तो पाळण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. आमदार निधीतून भिंगारमध्ये अनेक विकासकामे केली. आता भिंगारला प्रथमच राज्य शासनाकडून इतया मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे. त्यामुळे भिंगारचाही चेहरामोहरा येत्या काळात बदललेला दिसेल असा विश्वास आ. संग्राम जगताप यांनी व्यक्त केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...

संतापजनक! पंढरपूरला निघालेल्या वारीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Maharashtra Crime News: आषाढी वारीसारख्या भक्तिभावाच्या पर्वात दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडलेल्या एका...

आमदार रोहीत पवार यांना धक्का; जवळच्या सहकार्यावर अविश्वासाचा ठराव..

जामखेड । नगर सहयाद्री:- कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव...