spot_img
अहमदनगरआमदार अमोल खताळ कडाडले! विघ्नसंतोषी प्रवृत्तीच्या लोकांवर अंकुश ठेवा, आता 'ते' धंदे...

आमदार अमोल खताळ कडाडले! विघ्नसंतोषी प्रवृत्तीच्या लोकांवर अंकुश ठेवा, आता ‘ते’ धंदे बंद करा..

spot_img

संगमनेर । नगर सहयाद्री :-
संगमनेरात सुरू असणारे अवैध धंदे आणि अनाधिकृत कत्तलखान्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. असा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या विघ्नसंतोषी प्रवृत्तीच्या लोकांवर अंकुश ठेवण्याचे काम पोलीस अधिकाऱ्यांनी करावे तसेच शहरात सुरू असणारे अवैध धंदे बंद करून अनधिकृत चालणारे सर्व कत्तलखाने उध्वस्त करावे असे सक्त निर्देश आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर शहर, तालुका व घारगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना दिले.

संगमनेर शहरातील शासकीय विश्राम गृहावर संगमनेर शहर, तालुका घारगाव या तीनही पोलीस ठाण्यातील गुन्हेगारी बाबतचा आढावा घेण्यासाठी आ.अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीस संगमनेर उप विभागाचे पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख तालुका पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे आणि घारगावचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते.
पोलिस स्थानक मध्ये आलेल्या तक्रारदार यांच्या बरोबर कर्मचारी यांचे वर्तन सभ्यपणाचे असावे, उद्धटपने वागू नये अशा सूचना ही दिल्या आहेत.

आ. खताळ म्हणाले, मागील काही दिवसापूव शहरात सुरू असणारे सर्व अनाधिकृत कत्तलखाने उध्वस्त केले होते. पोलिसांनी मागील आठवड्यात तीन ते चार ठिकाणी कत्तलखान्यावर कारवाया केल्या आहेत यापुढे अशा ठिकाणी निदर्शनास आल्यावर ज्या हद्दीत असतील तेथील प्रशासनाने, नगर पालिका प्रशासनाने नोटीसा देऊन शहरात सुरू असणारे अनधिकृत कत्तल खाने उध्वस्त करण्यात यावे असे निर्देश पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनपा प्रभाग रचनेबाबत महत्वाचे आदेश प्राप्त; सप्टेंबरला अंतिम प्रभाग रचना, असा आहे कार्यक्रम

सुनील चोभे | नगर सह्याद्री महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश नगर विकास विभागाने...

‌‘सेनापती बापट‌’ मध्ये गैरव्यवहार! चेअरमनसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल

पारनेर | नगर सह्याद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील अळकुटी येथील 75 वषय शेतकरी आणि विमा...

नगर, श्रीगोंदा, शेवगाव,पाथर्डीत तुफान वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा

पिकांचे नुकसान | शेड, घराची पत्रे उडाली | जेऊर, चिचोंडी पाटील, खडकीत नुकसान अहिल्यानगर...

‌‘रयत‌’चे विध्यार्थी गिरवणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे धडे: चेअरमन चंद्रकांत दळवी

कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत शिक्षण देणारी राज्यातील पहिली शिक्षण संस्था ‌‘रयत‌’ ठरणार अहिल्यानगर | नगर सह्याद्री आर्टिफिशियल...