spot_img
अहमदनगरमहायुतीचे मंत्री ठरले! कोणा कोणाला फोन? वाचा संपूर्ण यादी

महायुतीचे मंत्री ठरले! कोणा कोणाला फोन? वाचा संपूर्ण यादी

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा आज रविवारी नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे. मात्र किती मंत्र्यांचा शपथविधी होणार, घटक पक्षांच्या वाट्याला किती मंत्रीपदे मिळणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

प्रशासनाने नागपूरच्या राजभवनमध्ये शपथविधीची जोरदार तयारी केली असून दुपारी ४ वाजता शपथविधी पार पडणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे २१, शिवसेनेचे १२ आणि राष्ट्रवादीचे १० मंत्री शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांना संबंधित पक्षाच्या वरिष्ठांनी फोन केले आहेत.

भाजपकडून आतापर्यंत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, चंद्रकांत पाटील, पंकज भोयर, मंगलप्रभात लोढा, गिरीश महाजन, जयकुमार गोरे, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, मेघना बोर्डीकर, अतुल सावे आणि माधुरी मिसाळ यांना शपथविधीसाठी फोन गेले आहेत.

तसेच शिंदेंच्या शिवसेनेकडून भरत गोगावले, उदय सामंत, प्रताप सरनाईक, योगेश कदम, आशिष जैस्वाल, गुलाबराव पाटील, शंभूराजे देसाई, प्रकाश आबीटकर,संजय शिरसाट, संजय राठोड आणि दादा भूसे यांना मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी फोन गेला आहे. तर दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार या माजी मंत्र्‍यांचा पत्ता कट झाला आहे..शिवसेनेत ५ जुने मंत्री आणि ७ नवीन आमदारांना म्हणजे एकुण १२ जणांना संधी मिळणार आहे.

त्याचबरोबर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्तामामा भरणे, हसन मुश्रीफ आणि नरहरी झिरवाळ यांना मंत्रि‍पदासाठी फोन आले आहेत. तर धनंजय मुंडे, छगन भुजबळ, अनिल पाटील, संजय बनसोड या नेत्यांना अद्याप मंत्रि‍पदासाठी फोन आलेला नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आ. दातेंनी विधानसभेत मांडली शेतकऱ्यांची व्यथा; पारनेर तालुक्यात बोगस बियाणे विकणारे दलाल; ‘त्यांचा…’

पारनेर । नगर सहयाद्री:- आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे भक्कमपणे...

मर्चंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेकडून ‌’शेड्यूल्ड बँक‌’ दर्जा प्राप्त

विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात वाढ होणार: हस्तीमल मुनोत अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगरच्या आर्थिक क्षेत्रात...

भिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....