spot_img
ब्रेकिंगRain update: आज दुहेरी संकट! हवामान विभागाने वर्तवला नवा अंदाज? मुंबईकर घामाघूम...

Rain update: आज दुहेरी संकट! हवामान विभागाने वर्तवला नवा अंदाज? मुंबईकर घामाघूम होणार अन नगरकर…

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
राज्यात सातत्याने हवामान बदल घडतांना दिसत आहे. एप्रिलच्या सुरवातीलाच अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली होती तर मे महिन्याच्या रखरखत्या उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले होते. त्यातच आता पुन्हा राज्यावर दुहेरी संकट निर्माण झाले असून मुंबईकर घामाघूम होणार तर नगर आणि नाशिकमध्ये मेघगर्जनेसह गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविला आहे. मुंबईत मात्र उकाडा कायम राहणार असून मुबईकर घामाघूम होणार आहे. तर मुंबई शहर, मुंबई उपनगरासह रायगड, ठाणे, पालघरमध्ये उष्णतेची लाटसदृश वातावरणाचा इशारा कायम असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे.

तसेच नगर आणि नाशिकमध्ये आज मेघगर्जना आणि ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज आहे. नगर आणि नाशिकमध्ये गारपीट तर नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली. जळगाव, पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जालना, बीड, धाराशिव, लातूर, धुळे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, हिंगोली, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा अलर्ट दिला आहे.

मान्सून ३१ मे रोजी केरळात पोहोचणार
भारतीय हवामान खात्याने बुधवारी एक मोठी घोषणा केली आहे. या वर्षी मान्सून ३१ मे रोजी केरळमध्ये पोहोचण्याची शयता आहे. आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी बुधवारी सांगितले की, हे लवकर नाही. केरळमध्ये मान्सून सुरू होण्याची सामान्य तारीख १ जून असल्याने ही सामान्य तारखेच्या जवळपास आहे. आयएमडी डेटानुसार, केरळमध्ये मान्सूनच्या सुरुवातीची तारीख गेल्या १५० वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बदलली आहे, राज्यात मान्सूनची सर्वात पहिली सुरुवात ११ मे १९१८ रोजी झाली होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दहा लाख चौरसफुट ओपनस्पेसचा १०० कोटींचा घोटाळा!

मनपाच्या आकृतीबंधात नगर रचनाकार हे पदच नाही, तरीही त्याला दिले सहायक संचालकांचे अधिकार |...

आ. संग्राम जगताप यांचा जैन मंदिर ट्रस्टचा भूखंड हडप करण्याचा डाव; थाटले कार्यालय, ठाकरे सेनेचा काय आहे आरोप पहा

पुणे / नगर सह्याद्री - पुण्यातील जैन हॉस्टेल भूखंड प्रकरणातून उडालेला धुरळा खाली बसत नाही...

पीएम किसान योजना; ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाहीत पैसे, काय कारण पहा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - PM Kisan Yojana : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पीएम किसान...

उमेदवारीसाठी इच्छुक राष्ट्रवादीच्या दारी; कोणी कोणी दिल्या मुलाखती…

२०० जणांनी दिले अर्ज; भाजप-राष्ट्रवादी युतीच्या संकेतांनंतर हालचाली वेगवान अहिल्यानगर | नगर सह्याद्री आगामी महापालिका निवडणुकीसाठी...