spot_img
ब्रेकिंगMaratha Reservation: जरांगे पाटलांच्या उपोषणाला गावकऱ्यांचाच विरोध; केली ही मोठी मागणी

Maratha Reservation: जरांगे पाटलांच्या उपोषणाला गावकऱ्यांचाच विरोध; केली ही मोठी मागणी

spot_img

जालना / नगर सह्याद्री
मराठा आरक्षण तसेच सगे सोयरेच्या अंमलबजावणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. ४ जूनपासून मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू करणार आहेत. मात्र जरांगे पाटील यांच्या या उपोषणाला गावकऱ्यांनीच विरोध केला असून त्यांनी परवानगी देऊ नये, अशी मागणी अंतरवाली सराटीमधीलच काही गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

जालन्यातील अंतरवाली सराटीत मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील हे ४ जूनला पाचव्यांदा उपोषणाला बसणार आहे. त्यांच्या उपोषणाची तयारी पूर्ण झाली आहे. अशातच मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला अंतरवाली सराटीमधील गावकऱ्यांनीच विरोध दर्शवला आहे.

जरांगे पाटील यांचे सहकारी राहिलेले डॉ. रमेश तारख, किरण तारख यांच्यासह काही गावकऱ्यांचा या उपोषणाला विरोध आहे. जरांगे पाटीलांच्या उपोषणाला परवानगी देवू नये, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर गावातील शंभर लोकांच्या सह्या आहेत.

आंतरवालीतील सर्व जाती-धर्माच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच जरांगे पाटील यांचे आंदोलनद्वेष, राग, तिरस्कारमध्ये परावर्तित झाले असल्याचा आरोप करण्याक आला असून गावातील वातावरण सुरक्षित नसून जातीय सलोखा ही बिघडलाय. या जातीय तेढातून भांडणे होऊन, कायदा व सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे या निवेदनात लिहिले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी दुर्घटना! विद्यार्थ्यांनी भरलेली स्कुल बस घाटात पलटली; ३५ विद्यार्थी…

संगमनेर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुयात शाळेच्या बसला अपघात झाला आहे. पुणे...

राज ठाकरेंच्या घातपाताचा प्लॅन: ‘बड्या’ नेत्याचा खळबळजनक आरोप

मुंबई। नगर सहयाद्री: महाराष्ट्राच्या राजकारणात आता राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच...

आमदार काशीनाथ दाते यांच्या प्रयत्नांना यश; पारनेरची जलक्रांती निर्णायक वळणावर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुयातील जलसंपत्ती विकासाला चालना देण्यासाठी आमदार काशिनाथ दाते यांनी गेल्या...

सुसाट टेम्पोने उडविल्या १० दुचाकी, अहिल्यानगर शहरातील दुर्घटना कशी घडली?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एका टेम्पोने चारचाकीसह ८ ते १०...