spot_img
महाराष्ट्रमनोज जरांगेंचा पुन्हा गौप्यस्फोट, देवेंद्र फडणवीसांचा पहाटे तीन वाजता फोन आला आणि..

मनोज जरांगेंचा पुन्हा गौप्यस्फोट, देवेंद्र फडणवीसांचा पहाटे तीन वाजता फोन आला आणि..

spot_img

जालना / नगर सह्याद्री : मराठा आंदोलक मनोज जरांगे हे त्यांच्या सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या मागणीवर ठाम असून सध्या ते विविध भागात बैठक, महासंवाद मेळावे घेत आहेत. दरम्यान त्यांनी आता देवेंद्र फडणवीसांबाबत पुन्हा एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

पहाटे तीन वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मला फोन केला होता असं जरांगे यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर आदर्श आचारसंहित लागू झाली आहे तोपर्यंत मी कायद्याचं पालन करतो आहे. पण मी शांत बसणार नाही. ओबीसीतून आरक्षण घेणारच असा पुनरुच्चार मनोज जरांगे यांनी केला आहे.

“मला देवेंद्र फडणवीसांनी पहाटे तीन वाजता फोन केला होता. गुन्हे मागे घेतो असंही सांगितलं. त्यांना बोलायचं नव्हतं पण तरीही ते बोलले. एक वाजता आधी फोन केला, तो मी घेतला नाही. त्यानंतर पहाटे तीन वाजता फोन केला. त्यांचे लोक येऊन बसले. मला सांगितलं की इथून पुढे काही होणार नाही. पण कारवाया सुरुच आहेत. याचा अर्थ एकीकडून गोड बोलायचं आणि दुसरीकडून द्वेष दाखवून मराठे संपवायचे असंच दिसतं आहे. एकीकडे सांगायचं आता काही होणार नाही. दुसरीकडून कारवाया सुरुच आहेत. ” असा गौप्यस्फोट मनोज जरांगेंनी केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘मळगंगा देवी यात्रा उत्सवास आजपासून प्रारंभ’

भावीकांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील व आमदार काशिनाथ दाते सर यांचे केले कौतुक निघोज |...

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ‘ईतका’ मुद्देमाल जप्त

संगमनेर | नगर सह्याद्री तालुक्यातील घारगाव परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाच अवैध दारू विक्रेत्यांवर...

श्रीरामपुरात सरकारवर फसवणुकीचा गुन्हा; शेतकरी संघटनेचा दावा, नेमकं प्रकरण काय?

श्रीरामपूर | नगर सह्याद्री महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्यावरून शेतकऱ्यांनी...

पारनेर तालुक्यातील ११४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणासाठी ‘या’ तारखेला सोडत सभा

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील 114 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षण निश्चितीसाठी विशेष सोडत सभेचे...