spot_img
महाराष्ट्रमनोज जरांगे यांचा मुंबईला निघण्यापूर्वी मोठा संदेश, म्हणाले, मराठ्यांनो…

मनोज जरांगे यांचा मुंबईला निघण्यापूर्वी मोठा संदेश, म्हणाले, मराठ्यांनो…

spot_img

जालना/नगर सहयाद्री : मराठा आंदोलक उद्या मुंबईकडे निघणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा समाजबांधव आता मुंबईला निघतील. या आंदोलनाला निघण्यापूर्वीच मनोज जरंगे यांनी मराठा समाजाला महत्वाचा संदेश दिला. उद्या मराठे मुंबई निघणार आहेत. मराठा समाजाने आता घरी बसू नये. हे शेवटचे आंदोलन आहे आहे.

मराठा समाजाने ताकदीने मुंबईकडे निघावे, मराठे भीत नसतात व आम्ही गुन्हे दाखल होण्यास भीत नाहीत. आम्ही मुंबईला जाणार आहोत. मी आणि माझा समाज 26 जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण करणार आहे. 26 तारखेला गल्ली गल्लीत मराठा समाज दिसणार आहेत. मी मारायला भीत नाही. मी मुंबईवरुन आता आरक्षण घेऊन येणार आहे. आपण शांततेत चाललो आहोत. पण आपल्यावर गुन्हे दाखल झाले तर राज्यात लोकशाही नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

दुरुस्तीच्या नावाखाली वेळ मारण्याचा प्रकार
शासनाकडून सुधारणा आणि दुरुस्तीच्या नावाखाली वेळ मारून नेला जात आहे. अध्यादेश महत्त्वाचा आहे. पण ज्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत त्यांना दाखले दिले पाहिजे. आता 54 लाख लोकांना नोंदी मिळाल्या आहे. समितीने किती काम केले हे बघणे महत्वाचे आहे. ड्राफ्ट सुधारणा फक्त बहाणे आहेत. मी मराठ्यांची फसवणूक होऊ देणार नाही. आता 54 लाख लोकांना प्रमाणपत्र भेटले पाहिजे

ठरल्याप्रमाणे मुंबईला जाणार
जे ठरले आहे त्या मार्गाने मराठा समाज मुंबई जाणार आहे. आता आम्ही निघालो आम्ही आरक्षण घेणारच आहोत. आता आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. आतापर्यंत दोन उपोषण झाले. हे आरक्षणासाठी शेवटे उपोषण असणार आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आरक्षण सोडतीने पारनेरचे राजकारण तापले; महाविकास आघाडी आणि महायुतीत चुरस

गणेश जगदाळे | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी...

निघोज जिल्हा परिषद व पंचायत समिती गटात चुरशीची निवडणूक रंगण्याचे संकेत

आरक्षण जाहीर; निवडणुकीचे ढोल वाजायला सुरुवात, दिवाळीमध्येच प्रचाराचा धडाका निघोज । नगर सहयाद्री:- निघोज जिल्हा...

मनपा निवडणूक मॅनेज करण्याकरिता हस्तक्षेप; ‘यांनी’ केली निवडणूक आयोगाकडे तक्रार

अंतिम प्रभाग रचना जाहीर न झाल्याने ठाकरे शिवसेनेची राज्य निवडणूक आयोगाकडे क्रार अहिल्यानगर | नगर...

अक्षय कर्डिलेंच्या एण्ट्रीने राजकारण तापणारत!, कोतकर समर्थकही निवडणुकीच्या रिंगणात!

लामखडे, हराळ, मोकाटे सेफ, कार्ले, झोडगेंची अडचण | नगर तालुक्यात इच्छुकांची भाऊगद! सुनील चोभे |...