spot_img
ब्रेकिंगमनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली; डॉक्टर म्हणाले...

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली; डॉक्टर म्हणाले…

spot_img

 

जालना | नगर सह्याद्री

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. यंदाची विधानसभा निवडणूक महाविकासआघाडी विरुद्ध महायुती अशी होणार आहे. विधानसभा निवडणुकीत मराठा मतांचे राजकारण पाहायला मिळणार आहे. त्यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणासाठी झगडणारे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवली आहे. यामुळे त्यांना सलाईन लावण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून मनोज जरांगे पाटील हे मैदानात उतरले आहेत. त्यांनी काही ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. तर विविध पक्षाचे नेते, आमदार, खासदार मराठा मतांसाठी सातत्याने जरांगे पाटील यांची भेट घेत आहे. मनोज जरांगेना भेटण्यासाठी येणारे विविध पक्षांचे पदाधिकारी, आमदार, खासदार हे रात्री उशिरा येतात. त्यांची चर्चा ही उशिरापर्यंत सुरु असते. त्यामुळे जरांगे पाटील यांचे सतत जागरण होत आहे.

तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे सातत्यानं उपोषण करत असल्याने त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला आहे. यामुळे मनोज जरांगे पाटील यांना काल रात्रीपासून ताप, अशक्तपणाचा त्रास होत आहे. तापासोबत त्यांना इन्फेशन देखील झाले आहे. तापासोबत अंगदुखी, अशक्तपणा, घसादुखी आणि कफ झाला आहे.

डॉटरांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे यांची काल रात्री तब्येत बिघडल्याने त्यांना घरीच सलाईन लावण्यात आले. तसेच त्यांच्या रक्ताचे नमुनेही घेण्यात आले आहे. ते नमुने अधिक तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. सध्या मनोज जरांगे पाटील यांना विश्रांतीची गरज आहे. कारण त्यांना खूप अशक्तपणा आला आहे. त्यामुळे त्यांना आराम करण्याचा सल्ला डॉटरांनी दिला आहे. तसेच आज सकाळीही मनोज जरांगेंना सलाईन लावण्यात आले आहे. सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...