spot_img
महाराष्ट्रविरोधी पक्षनेते वडेट्टीवारांच्या आरोपाने मनोज जरांगे पाटील तापले, केला 'हा' जबरदस्त घणाघात

विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांच्या आरोपाने मनोज जरांगे पाटील तापले, केला ‘हा’ जबरदस्त घणाघात

spot_img

जालना / नगर सहयाद्री : मराठा आरक्षण मुद्द्यावर एकीकडे चांगलेच रण पेटले असताना आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा घणाघात मनोज जरांगे यांच्यावर केला होता. परंतु आता जरांगे पाटील यांनी याविरोधात देखील टिपणी करत वडेट्टीवारांवर घणाघात केला आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे ?
विरोधी पक्षनेते आणि विधिमंडळ ही न्यायाची मंदिरे आहेत. आता आपल्या जातीचा अभिमान बाळगणारा विरोधी पक्षनेता राज्यघटनेत आहे का? सरकारने न्याय दिला नाही तर विरोधी पक्षनेते मोठा आवाज उठवतात आणि सरकारला वाकवतात. राहुल गांधींनी हे शिकवले का? मराठ्यांविरोधात आवाज उचलतो, त्यासाठी राहुल गांधींनी पद दिलंय का असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर केला आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, २४ तारखेनंतर मी सर्वांना दाखवून देईन, माझ्या गरीब मुलांना आरक्षण द्या, ही धमकी आहे असे तुम्हाला वाटते का? राहुल गांधींनी तुम्हाला मराठ्यांच्या विरोधात बोलायला पाठवलं का? विरोधी पक्षनेता हा जनतेचा आवाज असतो. क्षत्रीय मराठ्यांविरोधात बोलला तर तुझ्या पाठीवर थाप टाकू असं राहुल गांधींनी सांगितलंय का? आम्ही बोललो, धमकी कुठे दिली. सरकारला वाईट

बोलले तर तुम्हाला काय झालं? तुमच्या राजकारणात आम्हाला का डाग लावताय? राजकारणासाठी करत असतो तर मराठवाड्याला आरक्षण मिळत असताना समितीला राज्यभरातील मराठ्यांसाठी काम करायला लावलं नसतं. माझा मराठा समाज कानाकोपऱ्यात एक झालंय याचा मला आनंद आहे असं त्यांनी म्हटलं.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राखेतून फिनिक्ससारखी भरारी — माजी सैनिक नवनाथ खामकर यांचा संकल्प एस. मार्ट पुन्हा उभा

  श्रीगोंदा / नगर सह्याद्री - राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखी किमया श्रीगोंद्यात पाहायला मिळाली...

स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुका संभाजी ब्रिगेड ताकदीने लढवणार – इंजी. शामभाऊ जरे

श्रीगोंदा / नगर सह्याद्री दिवाळीनंतर होणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी संभाजी ब्रिगेड...

ओबीसी आरक्षण कमी झाल्याचा पुरावा आहे का? राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ओबीसी आरक्षणावरून शुक्रवारपासून वातावरण पुन्हा तापले आहे. बीडमध्ये ओबीसी...

अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर...