spot_img
महाराष्ट्रभुजबळांच्या बालेकिल्ल्यातच मनोज जरांगें कडाडले; म्हणाले मी ठरवलं तर...

भुजबळांच्या बालेकिल्ल्यातच मनोज जरांगें कडाडले; म्हणाले मी ठरवलं तर…

spot_img

नाशिक / नगर सह्याद्री –
मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वी तब्येत बिघडल्याने रुग्णालयात दाखल झालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी येवला गाठलं आहे. येवल्यात मनोज जरांगे पाटील यांनी थेट छगन भुजबळ यांच्यावर तोफ डागली आहे. ‘मी ठरवलं तर डायरेक्ट कार्यक्रम करतो, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे.

मनोज जरांगे पाटील यांची अंदरसुलमध्ये सभा झाली. या ठिकाणी त्यांच्याआधी छगन भुजबळ यांचा सभा झाली. भुजबळ यांच्यासभेनंतर मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी एकवटले. या सभेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, ‘येवला तालुक्यात सांत्वनपर भेट आहे. आता रस्त्यात गाव आहे. ते बाजूला सारू का? कोणाला पाडा हे सांगायला मी आलो नाही. मात्र, मराठा समाजाला विरोध करणाऱ्याला पाडा. आता कोणी पडत असेल तर त्यात माझा काय दोष? एकदा जर लोकांनी ठरवलं, येवला पवित्र करायचं तर काही अडचण आहे का? माझ्या पोटात एक आणि ओठात एक असं काही नाही. तुम्हाला ज्याला पाडायचं, त्याला पाडा. ज्याला निवडून आणायचं त्याला निवडून आणा. पण मराठा आरक्षण डोळ्यासमोर ठेवा’.

‘मी ठरवलं तर डायरेक्ट कार्यक्रम करतो. आता एक माईक जुना झाला म्हणून दुसरा हातात घेतला. तो जुना सारखा सारखा बिघडतो. मी नवा माईक हातात घेतला, यातून लोकांच्या न्यायाचा आवाज येतो, असं म्हणत जरांगेंनी भुजबळांना लक्ष्य केलं.

नरेंद्र मोदींवर टीका करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, ‘मराठ्यांची गरजच नाही, असं म्हणण्यापेक्षा छोट्या छोट्या उद्योगपतींची देखील गरज नाही. मोठेच उद्योगपती लागतात. त्यांचा संदेश बरोबर आहे. कारण सरकार पाडायला आता गरीब एक झाले आहेत. मत वाया जाऊ देऊ नका. ज्याला पाडायचे, त्याला पाडा हे मी सांगितलं आहे. मी कोणाचं नाव घेतलं नाही. आमचं विधानसभेला समीकरण कुणाशी जुळलं नाही हे दोन्ही सारखेच आहे’.

प्रचाराला कुणीही येईल म्हणून आपल्या सोबत आहे, असं नाही. काही व्यासपीठावर पडून देखील रपारप पाडतील. लोक तिकडे दिसले तरी शेवटी जात खूप महत्त्वाची आहे. शेवटी मतदान करताना त्याच्या समोर त्याची लेकरं आलीच पाहिजेत. कोणी बरोबर असल्याने काही मते पडत नाही. त्यांच्या बरोबर असून देखील कार्यक्रम होतो, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

चार खासदार हनी ट्रॅपचा जाळ्यात! संजय राऊतांचा ट्विट बॉम्ब, वाचा सविस्तर

मुंबई | नगर सह्याद्री:- राज्यातील राजकारण पुन्हा एकदा हनी ट्रॅप प्रकरणामुळे ढवळून निघाले असून, शिवसेना...

थाटामाटात लग्न पार पडले अन् ‘नवरदेवा’वरच गुन्हा दाखल झाला! काय आहे प्रकरण?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- अहिल्यानगर येथील कोतवाली पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीशी बालविवाह घडवून आणल्याप्रकरणी...

मुख्याध्यापकाकडे मागीतली पाच लाखांची खंडणीची; ‘या’ संस्थेच्या चेअरमनसह दोघांवर गुन्हा दाखल

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात एका शिक्षकाने शाळेच्या चेअरमन आणि स्वीकृत सदस्यावर...

209 बळी घेणाऱ्या साखळी बॉम्बस्फोटांतील ११ आरोपींची 19 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

मुंबई | नगर सह्याद्री:- मुंबईच्या पश्चिम उपनगरीय रेल्वेमार्गावर 2006 रोजी 11 मिनिटांत सात ठिकाणी झालेल्या...