spot_img
ब्रेकिंगमतदानाच्या दिवशीच मनोज जरागेंचे मोठे आवाहन, 'त्यांना' सोडू नका....

मतदानाच्या दिवशीच मनोज जरागेंचे मोठे आवाहन, ‘त्यांना’ सोडू नका….

spot_img

जालना | नगर सह्याद्री

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. घनसावंगी मतदारसंघात गोरी गंधारी गावात मनोज जरांगे यांनी मतदान केलं. प्रत्येक नागरिकाने मतदान करून आपल्या हक्काचा माणूस निवडला पाहिजे. यावेळी मतदानाचा उठाव करावा लागेल असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे. आपला अधिकार आहे. योग्य माणूस निवडण्याची हीच संधी असते. सर्व जनतेने मतदान केलं पाहिजे. मराठा समाजाने शंभर टक्के मतदान करायचं आहे. आपल्या लेकराच्या बाजूने जो असेल त्याच्या बाजूने १००% मतदान करावं. मतदान करताना आपल्या लेकाला आणि लेकीला विचारून मतदान करावं. आरक्षणाला ज्यांनी विरोध केला त्याला सोडू नका. आपल मत विजयाच्या बाजूने पडलं पाहिजे, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.

कोणी माझ्या बाजूला फोटो काढला याचा अर्थ मी कोणाला पाठिंबा दिला असं नाही. हे समजणं समजून घ्यावं. समाजाने म्हणून जे करायचं ते करावं. कोणी संभ्रम निर्माण करेल मी कुठेही टीम पाठवली नाही. कुठेही मेसेज पाठवला नाही. मराठा समाजाने संभ्रम करून घेऊ नका तुम्हीच मालक आहात. आपला कोणालाही पाठिंबा नाही. मराठा समाजाने योग्य निर्णय घ्यावा, असं जरांगे यावेळी म्हणाले.

मनोज जरांगे पाटील हिंदुत्व तोडणारा राक्षस, अशा शब्दात स्वयंघोषित कालीचरण महाराज यांनी टीका केली. त्यांच्या या टीकेलाही मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. तो १००% राजकीय दलाल आहे. परत बोलला याचा अर्थ तो राजकीय नेत्यांची पाय चाटतो. त्याला हिंदू धर्माची काही घेणं देणं नाही. याला मराठ्यांचा प्रचंड तिरस्कार आहे. आहे. वढ्या – खोड्याला जन्मलेली पैदास आहे ही, अशा शब्दात मनोज जरांगेंनी टीका केली आहे.

मी मैदानात नाही. जनतेच्या हातात आहे. सगळं जनतेने अन्याय आणि अत्याचार विसरू नये. अंतरवालीत सामूहिक आमरण उपोषण होणार आहे. अंतरवाली सराटीत राज्यातील मराठा बांधव सामूहिक उपोषण करणार आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर सामूहिक उपोषणाची तारीख ठरवू, सरकार कोणतही येऊ द्या, असं जरांगे यावेळी म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आ. दातेंनी विधानसभेत मांडली शेतकऱ्यांची व्यथा; पारनेर तालुक्यात बोगस बियाणे विकणारे दलाल; ‘त्यांचा…’

पारनेर । नगर सहयाद्री:- आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे भक्कमपणे...

मर्चंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेकडून ‌’शेड्यूल्ड बँक‌’ दर्जा प्राप्त

विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात वाढ होणार: हस्तीमल मुनोत अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगरच्या आर्थिक क्षेत्रात...

भिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....