spot_img
ब्रेकिंगPolitics News: महायुतीच जागावाटप ठरलं! अमित शहांच्या बैठकीची राजकीय वर्तुळात चर्चा! अजित...

Politics News: महायुतीच जागावाटप ठरलं! अमित शहांच्या बैठकीची राजकीय वर्तुळात चर्चा! अजित पवारांना ‘किती’ जागा मिळणार?

spot_img

Politics News: लोकसभा निवडणुकीतील अपयशामुळे नैराश्यात असलेल्या कार्यकर्त्यांना लढण्याचे बळ देतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप १५० ते १६० विधानसभा मतदारसंघात चांगल्या स्थितीत असल्याचे महायुतीतील मित्रपक्षांना सांगितले आहे.

मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीत शहा यांनी २८८ पैकी कोणत्याही मतदारसंघात भाजप शिंदे गट किंवा अजित पवार गटाच्या उमेदवारांबद्दल कोणताही भेदभाव करणार नाही, असे आश्वासनही दिले. या दोन्ही पक्षांना त्यांचे आमदार असलेल्या मतदारसंघांत जागा देण्यात येईल. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार अमित शहा यांचे सूत्र लक्षात घेत महाराष्ट्रात अत्यंत लोकप्रिय असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्या पक्षासाठी कोणताही आग्रह धरलेला नाही.

अन्य मतदारसंघात ज्याची ताकद, त्यालाच संधी असे सूत्र स्वीकारण्यास तिघांनीही संमती दिली असल्याचेही समजते. सत्ता येणे महत्त्वाचे आहे, पक्षाचा अभिमान जपणे नव्हे यावरही तिघांचेही एकमत झाले आहे. मराठा समाजाचे आंदोलन तीव्र झाल्याचे चित्र पसरले असले तरी या समाजातील काही मते आपल्याला मिळतील, असा विश्वास महायुतीला आहे, असे एका नेत्याने सांगितले.

सध्या शिंदे गटाचा जोर ६० ते ६५ विधानसभा मतदारसंघांत दिसतो, अशी चर्चाही झाली. अजित पवार गटही ५० जागांची मागणी करत असला तरी त्यांनी ४० फार तर ४५ मतदारसंघ मागावेत, असे मत व्यक्त केले आहे, असे सांगण्यात आले आहे. अजित पवार गटाने केलेल्या पाहणीत २२ मतदारसंघ ते जिंकतील पण १४ मतदारसंघांत त्यांच्या उमेदवारांना जिंकण्यासाठी मित्रपक्षांची लागणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राखेतून फिनिक्ससारखी भरारी — माजी सैनिक नवनाथ खामकर यांचा संकल्प एस. मार्ट पुन्हा उभा

  श्रीगोंदा / नगर सह्याद्री - राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखी किमया श्रीगोंद्यात पाहायला मिळाली...

स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुका संभाजी ब्रिगेड ताकदीने लढवणार – इंजी. शामभाऊ जरे

श्रीगोंदा / नगर सह्याद्री दिवाळीनंतर होणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी संभाजी ब्रिगेड...

ओबीसी आरक्षण कमी झाल्याचा पुरावा आहे का? राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ओबीसी आरक्षणावरून शुक्रवारपासून वातावरण पुन्हा तापले आहे. बीडमध्ये ओबीसी...

अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर...