spot_img
अहमदनगरअहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीच; संगमनेर शहरातून निघणार विजयाची मिरवणूक

अहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीच; संगमनेर शहरातून निघणार विजयाची मिरवणूक

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगरच्या १२ मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांना धक्का बसलाच असल्याचे चित्र समोर आले असू अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहरातून महायुतीची विजयाची मिरवणूक काढली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महायुतीचे उमेदवार राधाकृष्ण विखे यांनी तिरंगी लढतीत दोन्ही उमेदवारांना धूळ चारत पुन्हा एकदा आपला गड कायम राखला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार संग्राम जगताप हे 39 हजार 650 मतांनी विजयी झाले आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा आशुतोष काळे यांनी बाजी मारली असून 1,23,838 मतांनी विजय मिळविला आहे. जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघातून एक मोठा धक्कादायक निकाल समोर आला आहे.

संगमनेर विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी पराभव केला आहे.तर राहुरी मतदारसंघात मा आमदार प्राजक्त तनपुरे आणि भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यात देखील जोरदार टक्कर पहायला मिळाली असून माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचा विजय झाला.

कर्जत जामखे मतदार संघामध्ये आमदार राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात अटीतटीचा सामना रंगला असल्याचे कटर आहे. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात आमदार मोनिका राजळे यांनी देखील आघाडी घेतली तर नेवासा मतदार संघात देखील आमदार गडाख यांना टक्कर देत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विठ्ललराव लंघे यांनी विजय मिळवला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शासकीय कामात अडथळा; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल, वाचा नगर क्राइम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भिंगार परिसरात घरगुती वादाच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपींनी धक्काबुक्की...

शरद पवार यांचा गंभीर आरोप; महायुतीच्या नेत्यांवर केली टीका., वाचा सविस्तर

मुंबई | नगर सह्याद्री निवडणुकीत कामावर नाही तर पैसे-निधीवर मतं मागितली जात आहेत. पैसे किती...

नो-पार्किंग कारवाईतील दंड कमी करा; अन्यथा मनपावर मोर्चा, कोणी दिला इशारा…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री शहरातील वाहतूक नियोजनाच्या नावाखाली नो-पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर करण्यात येणारी...

वारंवार वीज पुरवठा खंडीत, उद्योजकांना फटका; प्रश्न सोडविण्यासाठी बैठक, काय झाला निर्णय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर-एमआयडीसी परिसरातील उद्योगांना वीज पुरवठा खंडित होण्यामुळे तीव्र फटका बसत असून,...