spot_img
ब्रेकिंगMaharashtra Weather Forecast : राज्यात २ दिवसांत धुवांधार पाऊस! 'या' जिल्ह्यांना ऑरेंज...

Maharashtra Weather Forecast : राज्यात २ दिवसांत धुवांधार पाऊस! ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
उत्तर बांगला देशावरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आसाम, मेघालय आणि त्रिपुरामध्ये पुढील २ दिवसांत जोरदार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच २४ ते २७ ऑगस्ट दरम्यान गुजरात आणि महाराष्ट्रातही जोरदार ते अतिवृष्टीची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

उत्तर बांगला देशावरील कमी दाबा क्षेत्र याच प्रदेशावर कायम आहे. ते पुढील ४८ तासांत पश्चिम बंगालच्या पश्चिमेच्या दिशेला सरकण्याची शक्यता आहे. तसेच कर्नाटक- गोवा किनारपट्टीलगत पूर्व मध्य अरबी समुद्रात आणखी एका कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ते पुढील २४ तासांत उत्तरेकडे सरकण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

यामुळे या आठवड्यात कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस राहील. विशेषतः कोकण आणि गोव्यातील काही भागांत पुढील ७ दिवसांत जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात २३ ते २६ ऑगस्ट दरम्यान, विदर्भ आणि मराठवाड्यात २४ ते २५ ऑगस्ट दरम्यान जोरदार पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
दरम्यान, मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने पालघर, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी २४ ते २६ ऑगस्ट दरम्यान जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. रायगड जिल्ह्यात २३ ते २५ ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठाणे जिल्ह्यात २३ ते२४ ऑगस्ट दरम्यान यलो अलर्ट तर २५ ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट राहील. पुणे जिल्ह्याला २४ आणि २५ ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्याला २४ ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्यांचे हल्ले थांबवा, अन्यथा शस्त्र परवाने द्या, कोणी केली मागणी पहा

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी, मजूर, शालेय...

हैदराबाद गॅझेट संदर्भात हाय कोर्टाचा मोठा निर्णय, काय दिलाय निर्णय?

मुंबई / नगर सह्याद्री मराठा समाजाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हैदराबाद गॅझेटच्या...

व्होट चोरीवर राहुल गांधींचा सर्वात मोठा बॉम्ब!; मत अ‍ॅड अन् डिलीट कशी केली जातात? सर्व दाखवलं

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी...

…तर लक्ष्मण हाकेंना रस्त्यावर ठोकू, लेकीबाळीची इज्जत काढतोय; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या लग्नाच्या वक्तव्यावरून राजकाराण तापलं...