spot_img
ब्रेकिंगMaharashtra Weather Forecast : राज्यात २ दिवसांत धुवांधार पाऊस! 'या' जिल्ह्यांना ऑरेंज...

Maharashtra Weather Forecast : राज्यात २ दिवसांत धुवांधार पाऊस! ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
उत्तर बांगला देशावरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आसाम, मेघालय आणि त्रिपुरामध्ये पुढील २ दिवसांत जोरदार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच २४ ते २७ ऑगस्ट दरम्यान गुजरात आणि महाराष्ट्रातही जोरदार ते अतिवृष्टीची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

उत्तर बांगला देशावरील कमी दाबा क्षेत्र याच प्रदेशावर कायम आहे. ते पुढील ४८ तासांत पश्चिम बंगालच्या पश्चिमेच्या दिशेला सरकण्याची शक्यता आहे. तसेच कर्नाटक- गोवा किनारपट्टीलगत पूर्व मध्य अरबी समुद्रात आणखी एका कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ते पुढील २४ तासांत उत्तरेकडे सरकण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

यामुळे या आठवड्यात कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस राहील. विशेषतः कोकण आणि गोव्यातील काही भागांत पुढील ७ दिवसांत जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात २३ ते २६ ऑगस्ट दरम्यान, विदर्भ आणि मराठवाड्यात २४ ते २५ ऑगस्ट दरम्यान जोरदार पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
दरम्यान, मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने पालघर, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी २४ ते २६ ऑगस्ट दरम्यान जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. रायगड जिल्ह्यात २३ ते २५ ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठाणे जिल्ह्यात २३ ते२४ ऑगस्ट दरम्यान यलो अलर्ट तर २५ ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट राहील. पुणे जिल्ह्याला २४ आणि २५ ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्याला २४ ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

घराणेशाहीला मतदान करणं बंद केलं तर?

राजाच्या विरोधात विचार मांडले तरी ते राजाने सहन करावे अन् त्यावर चिंतन करावे! तीच...

Ahmednagar Breaking: ब्रेकिंग बातमी! खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला!

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गणेश मंडळांच्या...

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणी तरी येणार अन्….; ‘त्या’ घोषणेची शरद पवार यांनी उडवली खिल्ली! श्रीगोंद्याचा उमेदवार ठरला?

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणीतरी येणार आणि आमच्या जागेवर हक्क सांगत लढण्याची भाषा...

Ahmednagar Politics News :’बोलबच्चन करून पाच-दहा वर्षे जनतेला फसविता येते’; खा. नीलेश लंके यांचा माजी खा. सुजय विखे यांना टोला

श्रीगोंदा | नगर सह्याद्री:- जनतेला बोलबच्चन करून पटवता येत नाही. बोलबच्चन करून पाच-दहा वर्ष जनतेला...