spot_img
महाराष्ट्रMaharashtra Politics : 'राज ठाकरेंचे शरद पवारांवर गंभीर आरोप’

Maharashtra Politics : ‘राज ठाकरेंचे शरद पवारांवर गंभीर आरोप’

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद सिद्ध करण्याची तयारी सुरू केली आहे. महायुती सरकारकडून ‘लाडकी बहीण योजने’ची महिलांना माहिती देणे सुरु आहे. तर प्रत्येक पक्ष आपली रणनीती अधिक धारदार करत आहे. सर्वच पक्षातील नेते आता राज्यातील अनेक ठिकाणी दौरे करतांना दिसत आहे.

अशात मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. आज नागपूरमध्ये राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. राज ठाकरे यांनी राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणामागे शरद पवार कारणीभूत असल्याचेही ते म्हणाले.

राज्यातील जातीयवाद आणि फोडाफोडीचे राजकारण याला फक्त शरद पवार कारणीभूत आहे. पुलोद पसून याला सुरवात झाली. 91 मध्ये शिवसेना फोडली, भुजबळ, नारायण राणे यांना फोडले. हे राजकारण शरद पवार यांनी सुरू केले, जातीचे विष पवार यांनी पेरले. या सर्व गोष्टी राष्ट्रवादीच्य जन्मानंतर सुरू झाला, यापूर्वी महाराष्ट्र्र हा असा कधीच नव्हता, असे म्हणत राज ठाकरेंनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले.

ते पुढे म्हणाले,’प्रत्येकाला निवडणुकीत उभं राहायचे आहे. आमच्यासाठी पोषक वातावरण आहे. लोक मागील पाच वर्षात जे झाले ते कंटाळले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत ज्या पध्दतीने मतदान झाले, हे मतदान समजून घेतलं पाहिजे. या देशात एक गठ्ठा मुस्लिम समाजाने मोदी शहांविरोधात मतदान केले. भाजपने 400 पार संविधान बदलणार असे वक्तव्य त्यांच्याच लोकांनी केल्याने काही लोकांनी मोदी शाह विरोधात मतदान केले. असेही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, विधानसभा निवडणुकांच्या मोर्चेबांधणीसाठी राज ठाकरे विदर्भातील प्रत्येक भागात जात आहे. आज राज ठाकरे नागपूरमध्ये असून जिल्ह्यातील 12 विधानसभा जागेचा ते आढावा घेणार आहेत. नागपूरमध्ये राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...