spot_img
आर्थिकवाहन चालवताना नुसता मोबाईल हातात घेतला, तरीही होतो का दंड? काय सांगतो...

वाहन चालवताना नुसता मोबाईल हातात घेतला, तरीही होतो का दंड? काय सांगतो कायदा, पहा

spot_img

नगर सहयाद्री वेब टीम
डिजिटलाच्या जमान्यात स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र, वाहन चालवताना त्याचा वापर करणे महागात पडू शकतो. तरीही, बरेच लोक कॉल किंवा मेसेज करण्यासाठी गाडी चालवताना त्याचा वापर करतात. लोक वाहन चालवताना सोशल मीडिया तपासण्यासाठी फोन वापरतात. पण तुम्हाला माहित आहे का की गाडी चालवताना मोबाईल वापरणे हा कायदेशीर गुन्हा आहे आणि त्यासाठी तुम्हाला दंडही होऊ शकतो?

गाडी चालवताना एखाद्याला कॉल करणे किंवा मेसेज करण्यासाठी तुम्हाला हजारो रुपये मोजावे लागू शकतात. त्यामुळे चुकूनही अशी चूक करू नये. त्यामुळे अपघाताचाही धोका असतो. पण वाहन चालवताना फक्त स्मार्टफोन वापरल्याबद्दल वाहतूक पोलीस दंड वसूल करु शकतात का? वाहन चालवताना फोनवर बोलणे किंवा फोन वापरल्याने दंड आकारला जातो असे बहुतेकांना वाटते. फक्त फोन हातात ठेवल्याबद्दल दंड आकारला जातो की नाही ते आपण पाहूया.

भारतीय कायद्यानुसार वाहन चालवताना मोबाईल फोन वापरल्यास चालान देण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मोटार वाहन (सुधारणा 2019) कायदा, 1988 च्या कलम 184 अन्वये, ड्रायव्हिंग करताना हॅन्डहेल्ड कम्युनिकेशन डिव्हाइस वापरणे बेकायदेशीर आहे. याचा अर्थ असा की तुम्ही कॉल करा किंवा न करा, फक्त मोबाईल हातात धरल्यास दंड होऊ शकतो.

काय सांगतो कायदा?
मोटार वाहन (सुधारणा 2019) कायदा, 1988 चे कलम 184 धोकादायक ड्रायव्हिंगशी संबंधित आहे. स्वत:ची आणि इतरांची सुरक्षा धोक्यात घालून धोकादायक पद्धतीने वाहन चालवणाऱ्यांवर कलम 184 अन्वये कारवाई केली जाते. वाहन चालवताना मोबाईल फोन वापरल्यास 1,000 ते 5,000 रुपये दंड होऊ शकतो. याशिवाय 6 महिने ते 1 वर्षांपर्यंत तुरुंगवासही होऊ शकतो. तुम्ही कायद्याचे उल्लंघन केल्यास तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स काही महिन्यांसाठी रद्दही होऊ शकतो.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मंत्रिमंडळात मोठे निर्णय ; सुधारित पीक विमा, टोल नाक्यावर सूट अन बरच काही… पहा काय काय

मुंबई / नगर सह्याद्री: राज्यात यापुढे सुधारित पीक विमा योजना लागू करण्यात येणार आहे. तसेच...

“नाक दाबलं की तोंड उघडतं…”; सरकारच्या ‘त्या’ निर्णयाचे अण्णा हजारेंकडून समर्थन, काय म्हणाले पहा…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप...

सरकारचा मोठा निर्णय! पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ‘इतक्या’ लाखांची मदत जाहीर

मुंबई । नगर सहयाद्री:- जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील...

टेन्शन वाढवणारी बातमी! लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट, एप्रिलचा हप्ता मिळणार की नाही?

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार याकडे...