spot_img
ब्रेकिंगजयंत पाटील, अमोल कोल्हे थोडक्यात बचावले! 'शिवस्वराज्य' यात्रेच्या पहिल्याच दिवशी नेमकं काय...

जयंत पाटील, अमोल कोल्हे थोडक्यात बचावले! ‘शिवस्वराज्य’ यात्रेच्या पहिल्याच दिवशी नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

spot_img

पुणे । नगर सहयाद्री: –
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष कामाला लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने जनसन्मान यात्रेचे आयोजन केले आहे. असे असतानाच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेनंतर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडूनही आज (9 ऑगस्ट) रोजी शिवस्वराज्य यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.

या यात्रेच्या पहिल्याच दिवशी जुन्नर शहरात एक मोठी दुर्घटना टळली.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला होता. क्रेन पुतळ्याच्या दिशेने खाली येत असताना अचानक क्रेनच्या ट्रॉलीत तांत्रिक बिघाड झाला. या घटनेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, रोहिणी खडसे आणि मेहबूब शेख हे थोडक्यात बचावले.

या घटनाक्रमाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेमुळे यात्रेत काही काळ गोंधळ उडाला, परंतु त्यानंतर यात्रा पुढे सुरू ठेवण्यात आली.यात्रेच्या माध्यमातून महायुती सरकारच्या काळातील कारनाम्यांचा जनतेपुढे पर्दाफाश केला जाईल अशी माहिती यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्यांचे हल्ले थांबवा, अन्यथा शस्त्र परवाने द्या, कोणी केली मागणी पहा

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी, मजूर, शालेय...

हैदराबाद गॅझेट संदर्भात हाय कोर्टाचा मोठा निर्णय, काय दिलाय निर्णय?

मुंबई / नगर सह्याद्री मराठा समाजाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हैदराबाद गॅझेटच्या...

व्होट चोरीवर राहुल गांधींचा सर्वात मोठा बॉम्ब!; मत अ‍ॅड अन् डिलीट कशी केली जातात? सर्व दाखवलं

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी...

…तर लक्ष्मण हाकेंना रस्त्यावर ठोकू, लेकीबाळीची इज्जत काढतोय; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या लग्नाच्या वक्तव्यावरून राजकाराण तापलं...