spot_img
ब्रेकिंगअहिल्यानगर जिल्ह्यात काविळीचं थैमान; २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू

अहिल्यानगर जिल्ह्यात काविळीचं थैमान; २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू

spot_img

अकोले | नगर सह्याद्री
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर गावात काविळ आजाराने थैमान घातले आहे. शेकडो नागरिकांवर उपचार सुरु आहेत. उपचारा दरम्यान 22 वषय प्रियंका शेंडे या तरूणीचा मृत्यू झाला. दुषित पाण्यामुळे शेकडो नागरीक बाधित झाले असून शासकीय त्याचप्रमाणे अनेक खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

काविळच्या थैमानामुळे नागरीक धास्तावले असून आजचा आठवडे बाजारही बंद ठेवण्यात आला आहे. प्रशासनाने उपापयोजना सुरू केल्या असल्या तरी लवकरात लवकर काविळचा फैलाव थांबवणं गरजेचं आहे. कावीळ ही एक अशी स्थिती आहे. ज्यामध्ये रक्तातील बिलीरुबिनचं प्रमाण वाढतं. परिणामी त्वचा आणि डोळे पिवळे होतात.

ही समस्या अनेक कारणांमुळे होऊ शकते. यामध्ये यकृताचे नुकसान, पित्ताशयाचे खडे, संसर्ग, किंवा काही अनुवांशिक विकार यांचाही समावेश आहे. कावीळीवर कसे उपचार करावेत हे त्याची कारणं आणि तीव्रता यावर अवलंबून असतं. सौम्य कावीळ काही दिवसांत आपोआप बरी होऊ शकते. तर गंभीर कावीळ झाली असल्यास त्यासाठी डॉक्टरांकडून योग्य उपचार घेणं आवश्यक आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डीवायएसपी बनून प्लॉटच्या नावावर रेल्वे पोलिसांना घातला मोठा गंडा; काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री स्वतःला निलंबित डीवायएसपी असल्याचे भासवून आणि प्लॉटिंग व्यवसायाच्या नावाखाली रेल्वे सुरक्षा...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; अतिवृष्टी नुकसानीचे अनुदान खात्यावर वर्ग

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिवृष्टी आणि पूर यामुळे दिनांक ०१ जून ते सप्टेंबर २०२५ या...

मनपाची मनमानी थांबवा, त्यावर नागरिकांचा संताप, खासदार लंके म्हणाले…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर आकारणी प्रक्रियेतील अनियमितता, अस्पष्टता आणि नियमभंगाविरोधात...

मालमत्ताकरात मनपाकडून मोठे स्टेटमेंट; आयुक्त डांगे म्हणाले…

मालमत्तांच्या बांधकामात फेरबदल झालेल्यांना दिलेल्या खास नोटीसा मिळकत कराच्या नाहीत / कर निर्धारित करण्यासाठी...