spot_img
ब्रेकिंगअहिल्यानगर जिल्ह्यात काविळीचं थैमान; २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू

अहिल्यानगर जिल्ह्यात काविळीचं थैमान; २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू

spot_img

अकोले | नगर सह्याद्री
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर गावात काविळ आजाराने थैमान घातले आहे. शेकडो नागरिकांवर उपचार सुरु आहेत. उपचारा दरम्यान 22 वषय प्रियंका शेंडे या तरूणीचा मृत्यू झाला. दुषित पाण्यामुळे शेकडो नागरीक बाधित झाले असून शासकीय त्याचप्रमाणे अनेक खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

काविळच्या थैमानामुळे नागरीक धास्तावले असून आजचा आठवडे बाजारही बंद ठेवण्यात आला आहे. प्रशासनाने उपापयोजना सुरू केल्या असल्या तरी लवकरात लवकर काविळचा फैलाव थांबवणं गरजेचं आहे. कावीळ ही एक अशी स्थिती आहे. ज्यामध्ये रक्तातील बिलीरुबिनचं प्रमाण वाढतं. परिणामी त्वचा आणि डोळे पिवळे होतात.

ही समस्या अनेक कारणांमुळे होऊ शकते. यामध्ये यकृताचे नुकसान, पित्ताशयाचे खडे, संसर्ग, किंवा काही अनुवांशिक विकार यांचाही समावेश आहे. कावीळीवर कसे उपचार करावेत हे त्याची कारणं आणि तीव्रता यावर अवलंबून असतं. सौम्य कावीळ काही दिवसांत आपोआप बरी होऊ शकते. तर गंभीर कावीळ झाली असल्यास त्यासाठी डॉक्टरांकडून योग्य उपचार घेणं आवश्यक आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! स्वदेशी बनावटीचे तेजस लढाऊ विमान कोसळले

नगर सह्याद्री वेब टीम Tejas fighter jet crashes: दुबईमध्ये एअर शो प्रात्यशिकात भाग घेतलेल्या तेजस...

आमदार-खासदारांशी कसं वागणार? सरकारचा कर्मचाऱ्यांना ९ कलमी कार्यक्रम…

आमदार-खासदारांच्या पत्रांना दोन महिन्यांत उत्तर देण्याचं अनिवार्य केलंय / नियम मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई...

कुंभमेळ्यासाठी वृक्षतोड; सयाजी शिंदे सरकारवरसंतापले? आम्ही मरायलाही तयार…

मुंबई / नगर सह्याद्री - सयाजी शिंदे हे एक प्रसिद्ध अभिनेते आहेत, त्यांनी मराठी,...

रिक्षा थांबविण्याच्या वादातून रिक्षाचालकावर जीवघेणा हल्ला, नेमकं काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री येथील माळीवाडा बस स्थानक परिसरात रिक्षा थांबवण्याच्या किरकोळ वादातून दोन आरोपींनी...