spot_img
ब्रेकिंगजरांगे पाटलांचा सरकारला नवा 'अल्टीमेटम'; म्हणाले ३० सप्टेंबरपर्यंत..

जरांगे पाटलांचा सरकारला नवा ‘अल्टीमेटम’; म्हणाले ३० सप्टेंबरपर्यंत..

spot_img

Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एकदा पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. यावेळी मनोज जरांगे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला घेरलं आहे. आता मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीवरून तसेच शेतकऱ्याच्या पिकाला भाव कसा मिळत नाही, आम्ही ३० सप्टेंबरनंतर बघतो असं म्हणत सरकारला नवा अल्टीमेटम दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यामध्ये आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती ३० सप्टेंबरच्या आत करा, अशी मागणी केली आहे. सरकार ३० सप्टेंबरच्या आत कसं काय कर्जमाफी करत नाही, बघतोच असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी दिला आहे,
यावरून आता पुन्हा राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे.

सरकार मराठा समाजाच्या मागण्या स्वीकारत नाही, त्यामुळे सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही, विधानसभा निवडणुकीसाठी पश्चिम महाराष्ट्रातून इच्छुक उमेदवारांचे जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. तसेच कर्जमुक्तीच करायची. पिकविमे सगळे द्यायचे, अनुदान सुद्धा सगळं द्यायचं. शेतकऱ्याच्या पिकाला भाव कसा मिळत नाही, आम्ही ३० सप्टेंबरनंतर बघतो असं देखील मनोज जरांगे म्हणाले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये ग्राम महसुल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

  अहिल्यानगर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण (ता. नगर) येथील ग्राम महसुल अधिकारी दिपक साठे यास लाचलुचपत...

आता मराठ्यांचं वादळं दिल्लीत धडकणार, जरांगे पाटलांची थेट घोषणा, समोर आलं मोठं कारण

नगर सह्याद्री वेब टीम - मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज...

प्रवाशांनो लक्ष द्या! आता बीडहून अहिल्यानगरकडे रेल्वेगाडी धावणार; कुणाच्या हस्ते झाले उदघाटन?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अनेक दशकांपासून बीडवासीयांचे स्वप्न असलेली रेल्वे अखेर वास्तवात उतरली आहे....

आमदारांची ॲक्शन, पोलिसांची रिॲक्शन; रस्त्यावर गोमांस फेकणाऱ्या आरोपीला सहा तासात बेड्या

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील कोठला भागात मंगळवारी सायंकाळी रस्त्यावर गोमांस टाकल्याचे निदर्शनास आल्यावर...