spot_img
ब्रेकिंगजरांगे पाटलांचा सरकारला नवा 'अल्टीमेटम'; म्हणाले ३० सप्टेंबरपर्यंत..

जरांगे पाटलांचा सरकारला नवा ‘अल्टीमेटम’; म्हणाले ३० सप्टेंबरपर्यंत..

spot_img

Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एकदा पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. यावेळी मनोज जरांगे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला घेरलं आहे. आता मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीवरून तसेच शेतकऱ्याच्या पिकाला भाव कसा मिळत नाही, आम्ही ३० सप्टेंबरनंतर बघतो असं म्हणत सरकारला नवा अल्टीमेटम दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यामध्ये आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती ३० सप्टेंबरच्या आत करा, अशी मागणी केली आहे. सरकार ३० सप्टेंबरच्या आत कसं काय कर्जमाफी करत नाही, बघतोच असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी दिला आहे,
यावरून आता पुन्हा राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे.

सरकार मराठा समाजाच्या मागण्या स्वीकारत नाही, त्यामुळे सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही, विधानसभा निवडणुकीसाठी पश्चिम महाराष्ट्रातून इच्छुक उमेदवारांचे जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. तसेच कर्जमुक्तीच करायची. पिकविमे सगळे द्यायचे, अनुदान सुद्धा सगळं द्यायचं. शेतकऱ्याच्या पिकाला भाव कसा मिळत नाही, आम्ही ३० सप्टेंबरनंतर बघतो असं देखील मनोज जरांगे म्हणाले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...