spot_img
अहमदनगरआगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यात 'तो' पॅटर्न; मंत्री दादा भुसे यांनी केले जाहीर

आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यात ‘तो’ पॅटर्न; मंत्री दादा भुसे यांनी केले जाहीर

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री
राज्यतील केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडे (सीबीएसई) पालकांचा वाढत कल पाहून राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यात शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून सर्व सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नफ राबवण्यात येणार आहे. इयत्ता पहिलीला शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये सीबीएसई पॅटर्न सुरू करण्यात येणार आहे. तर, शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये दोन टप्प्यात हा पॅटर्न राज्यात राबविला जाणार आहे. याविषयीची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.

शालेय शिक्षण विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी दादा भुसे हे पुणे दौऱ्यावर होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भातील मोठी घोषणा केली. याविषयी बोलताना दादा भुसे यांनी, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी पावले उचलली जात आहेत. त्यात राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नफ देखील राबवण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी म्हटले.

तसेच येत्या शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये इयत्ता पहिलीला सीबीएसई पॅटर्नफ लागू होईल, असे देखील त्यांनी यावेळी जाहीर केले. तसेच शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये अन्य इयत्तांचा सीबीएसई पॅटर्न लागू होईल, त्यानुसार नवीन अभ्यासक्रम तयार करणे, त्यावर आधारित पाठ्यपुस्तके बालभारतीमार्फत छापणे अशी कार्यवाही होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.त्या शाळा बंद होणार नाहीत.

पुढे बोलताना दादा भुसे यांनी, या वर्षभरात शिक्षकांना नवीन अभ्यासक्रमाची माहिती देऊन त्यांना प्रशिक्षण दिले जाईल. राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्याथ संख्या वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याऐवजी तेथील विद्याथ संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील. परंतु, काही शाळांमध्ये पटसंख्या शून्य आहे, अशा ठिकाणी मात्र शाळांचा विचार करायला हवा, असेही ते म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मंत्री विखे शेतकऱ्यांच्या बांधावर; अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची केली पाहणी, दिले महत्वाचे आदेश..

पाथर्डी | नगर सह्याद्री सोमवारी अहमदनगर शहरासह जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. अनेक भागात अतिवृष्टी...

आयत्या पिठावर रेघोट्या मारून, खोटे सांगून क्रेडिट का घेता?; माजी मंत्री थोरात यांचा विरोधकांना सवाल

संगमनेर | नगर सह्याद्री दुष्काळी भागाला पाणी मिळावे याकरता सहकारमहष भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून कारखान्याच्या...

जीएसटी समितीच्या अहिल्यानगर शहर संयोजकपदी निखिल वारे

अहिल्यानगर | नगर सह्याद्री वस्तू आणि सेवांवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय सर्वसामान्यांसाठी लाभकारक आहे. पंतप्रधान...

महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर 40 जणांचा आक्षेप, वाचा, सविस्तर

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती दाखल करण्यासाठी दिलेल्या अंतिम दिवसापर्यंत (15...