spot_img
ब्रेकिंग‘शिवसंग्राम’ ऐवजी आता ‘या’ संघटनेची स्थापना!! विनायक मेटेंचे बंधू म्हणाले, स्वप्नांची पूर्तता...

‘शिवसंग्राम’ ऐवजी आता ‘या’ संघटनेची स्थापना!! विनायक मेटेंचे बंधू म्हणाले, स्वप्नांची पूर्तता…

spot_img

अलिबाग। नगर सहयाद्री
विनायक मेटे यांच्या पश्चात बंद पडलेल्या शिवसंग्राम संघटनेची पुर्नबांधणी करण्यात आली आहे. मेटे यांचे बंधू राम हरी मेटे यांनी आज किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने ‘जय शिवसंग्राम’ या नवीन संघटनेची घोषणा केली.

विनायक मेटे यांचे अकाली निधन झाल्यानंतर शिव संग्राम संघटनेचे काम थांबले होते. परंतु त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी या नवीन संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. विनायक मेटे यांच्या स्वप्नातील अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा करणार असून मराठा आरक्षण आंदोलनात सक्रीय सहभाग घेणार, असे राम हरी मेटे यांनी स्पष्ट केले. या खेरीज शेतकर्‍यांचे प्रश्न, राज्य लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्या परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रश्न घेवून आम्ही लढा देऊ, असे मेटे यांनी सांगितले.

रामहरी मेटे हे संघटनेचे प्रमुख राहणार असून सुरेश शेटये पाटील यांची संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. किल्ले रायगडावरील छत्रपतींच्या पुतळयाला आणि श्री जगदीश्वर मंदिरात अभिवादन करण्यात आले. भगवे फेटे परिधान केलेले कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा जयघोष करीत होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कचरा गाड्यांच्या माध्यमातून करदात्यांची लूट ; नगरसेवक योगीराज गाडे काय म्हणाले पहा

अहिल्यानगर । नगर सह्याद्री महापालिका व आयुक्त यशवंत डांगे जनतेची दिशाभूल करत असून नव्या कचरा...

आयुक्त डांगेंच्या नियुक्ती चौकशीचे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, नेमकं प्रकरण काय पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर महापालिकेचे आयुक्त व प्रशासक यशवंत डांगे यांच्या नियुक्तीवर...

धक्कादायक ! डॉक्टर महिलेच्या मृत्यूचा PM रिपोर्ट आला पण…’या’ प्रश्नांचं गूढ अद्याप कायम

सातारा / नगर सह्याद्री - सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील एका सरकारी रुग्णालयात कार्यरत असलेल्या युवा...

बच्चू कडूंचा मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम; पारनेरचे भूमिपुत्र आंदोलनात दाखल

पारनेर / नगर सह्याद्री - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी...