spot_img
देशपीएम किसान योजनेचा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; ‘हे’ काम करा, अन्यथा...

पीएम किसान योजनेचा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार; ‘हे’ काम करा, अन्यथा…

spot_img

नवी दिल्ली / वृत्तसंस्था –
केंद्र सरकारद्वारे शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत गरजू शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेंतर्गत 18 हप्ते जारी करण्यात आले आहेत. तर 19व्या हप्त्याची तारीख देखील समोर आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 24 फेब्रुवारीला या योजनेचा पुढील हप्ता दिला जाणार आहे. या दिवशी पंतप्रधान मोदी बिहारच्या दौऱ्यावर आहेत. येथूनच देशभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2 हजार रुपयांचा हप्ता जारी केला जाणार आहे.

काही दिवसांपूर्वीच केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याबाबत माहिती दिली होती. याआधी 18वा हप्ता ऑक्टोबर 2024 मध्ये महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातून जारी करण्यात आला होता.

ई-केवायसी गरजेचे
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य आहे. जर तुम्ही अद्याप ई-केवायसी पूर्ण केली नसेल, तर तुम्हाला 19वा हप्ता मिळणार नाही.

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडे आधार कार्ड, बँक खाते असणे आवश्यक आहे. शेतकरी स्वतः ऑनलाइन माध्यमातून घरबसल्या ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

ई-केवायसी करण्यासाठी फॉलो करा ही प्रोसेस
ई-केवायसी करण्यासाठी सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
होम पेजवरील Farmers Corner सेक्शनमध्ये जाऊन eKYC पर्याय निवडा.
आता eKYC पेजवर जाऊन तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका.
आधार क्रमांक टाकल्यानंतर सर्च ऑप्शनवर क्लिक करा.
यानंतर तुमचा मोबाइल क्रमांक टाका
मोबाइल क्रमांक टाकल्यानंतर तुमच्या आधारला लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर OTP येईल.
OTP टाकल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
सबमिट करताच तुमची eKYC प्रक्रिया पूर्ण होईल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अखेर नराधमाला जन्मठेप; अल्पवयीन मुलीवर केला होता अत्याचार!

जामखेड । नगर सहयाद्री:- १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी...

माणिकराव कोकाटे यांची आमदारकी धोक्यात?; विधानसभा अध्यक्ष नार्वेकर म्हणाले, आदेशाची प्रत..

Maharashtra Politics News: सुनील केदार यांना शिक्षा झाल्यानंतर त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात आली होती....

धक्कादायक! दिराने वहिनीला संपवल! दारुच्या नशेत असं काय घडलं..

Maharashtra Crime: मावस दिराने दारूच्या नशेत वहिनीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे....

भीषण! वाळूचा टिप्परने घेतला पाच जणांचा जीव; कुठे घडली घटना?

Maharashtra Crime : पुलाच्या कामावर गेलेल्या 5 मजुरांचा वाळूच्या ढिगार्‍यात दबून मृत्यू झाला आहे....