spot_img
अहमदनगरभारतानं विश्वकप जिंकला, तसंच आम्ही विधानसभा जिंकणार! मंत्री विखे पाटलांनी व्यक्त केला...

भारतानं विश्वकप जिंकला, तसंच आम्ही विधानसभा जिंकणार! मंत्री विखे पाटलांनी व्यक्त केला विश्वास, पहा काय म्हणाले..

spot_img

Radhakrishna Vikhe Patil: भारताने रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टी 20 वर्ल्ड कपचे विजेतेपद मिळवलं. दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत भारताने ऐतिहासिक विजय मिळवला. त्यामुळे संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. यावर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीम इंडियाचे कौतुक केले असून भारतानं विश्वकप जिंकला, तसंच आम्ही विधानसभेची जिंकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज जळगाव दौऱ्यावर आहेत. जळगाव येथे महसूलमंत्री विखे पाटलांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. मंत्री विखे पाटील म्हणाले की, दुधाला पाच रुपये अनुदानाची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळेल. दुधाच्या भुकटीची निर्यात थांबल्याने काही अडचणी आहेत. दूध भुकटीच्या निर्यातीला काही प्रोत्साहन देता येईल का? यावर विचार केला जात असल्याचे ते म्हणाले.

पुढे बोलतांना मंत्री विखे पाटील म्हणाले, भारताने विश्वकप जिंकला हा सगळ्या भारतीयांसाठी आनंदाचा क्षण आहे. भारतीय संघाचे आम्ही स्वागत करतो. त्यांचे अभिनंदन करतो. भारताने जसा विश्वकप जिंकला, तसेच आम्ही आगामी विधानसभेची निवडणूक त्याच ताकदीने जिंकणार असल्याचे सांगत त्यांनी अगामी विधानसभा निवडणुकीबाबत विश्वास व्यक्त केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला! दिल्ली, मुंबई आणि झारखंडमध्ये एकाचवेळी छापा; ५ दहशतवाद्यांना अटक

मुंबई । नगर सहयाद्री:- देशभरात पसरलेल्या दहशतवादी नेटवर्कवर मोठी कारवाई करत दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्ष...

लाडक्या बहिणींना आनंद वार्ता!, ऑगस्टचा हप्ता खात्यात खटाखट जमा

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट...

दोन लाख लंपास, बांधकाम व्यावसायिकाला धमकी तर चुलत्याला पुतण्यांची मारहाण; वाचा अहिल्यानगर क्राईम

Ahilyanagar Crime: शहरातील भवानी नगर येथील एका बांधकाम व्यावसायिकाला तलवारीने जीवे मारण्याची धमकी देत...

परतीच्या पावसाचा जोर वाढणार; २५ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा, वाचा सविस्तर

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यात सध्या पावसाचा खंड जाणवत असून शेतकऱ्यांच्या नजरा आता परतीच्या...